HW News Marathi
राजकारण

‘तिहेरी तलाक’पेक्षा महिला आरक्षणाला मंजुरी द्यावी !

नवी दिल्ली | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत सुरूअसलेल्या तिहेरी तलाकच्या विधेयकाच्या चर्चेत सहभागी झाल्या असून या विधेयकावर आपले परखड मत देखील मांडले आहे. यावेळी सुप्रिया यांनी तिहेरी तलाकबरोबरच संसदेतील महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला आहे. ‘तिहेरी तलाक’पेक्षा केंद्राने महिला आरक्षणाला मंजुरी द्यावी, समाजातील चित्र नक्की बदलेल, असे मत सुप्रिया सुळे व्यक्त केले आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिलांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका, तिहेरी तलाकच्या विधेयकाला विरोध नाही, परंतु केंद्र सरकारच्या पद्धतीला विरोध आहे. महिला आरक्षणालाही केंद्राने मंजुरी द्यावी. सामाजिक बदल हा झालाच पाहिजे. काय चुकीचे आणि काय बरोबर ही येणारी पिढी ठरवेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.

तिहेरी तलाक मुद्द्यावरुन टीका करताना काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. देव म्हणाल्या की, तिहेरी तलाक विधेयकामुळे मुस्लीम महिलांना काहीच मिळणार नाही. याऊलट मुस्लीम पुरुषांना गुन्ह्यात शिक्षा मिळणार आहे, असे सांगत सुष्मिता देव यांनी गुजरातमधील महिलेचे उदाहरण दिले. ‘गुजरातमधील एखाद्या महिलेने पतीने सोडल्याप्रकरणी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यास त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करणार का?’, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गिरीश महाजन यांनी घेतली डॉ. तडवी यांच्या कुटुंबीयांची भेट

News Desk

फडणवीसांच्या कार्यकाळात तब्बल ६५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा

News Desk

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा भरकटले

News Desk
राजकारण

मुख्यमंत्री पर्रीकर करणार लवकरच कामकाजाला सुरुवात !

Gauri Tilekar

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून जरी राज्यात परतले आहेत. परंतु अजूनही ते मंत्रालयात उपस्थित झालेले नाहीत. ते सध्या ते पूर्ण विश्रांती घेत असून सोमवारीपासून पुन्हा कामकाजाला सुरुवात करतील,अशी माहिती मिळत आहे.

“मनोहर पर्रीकर सोमवारी मंत्रालयात येतील,” असे याआधीही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, ते सोमवारी व मंगळवारीसुद्धा कार्यालयात आले नाहीत. गेले अनेक दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात येऊ शकले नसून मंत्रिमंडळाची बैठकही गेल्या अनेक आठवडे घेण्यात आलेली नाही. काही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी बाय सर्क्युलेशन पद्धतीने मंत्र्यांकडे फिरत होते, ते मंजूर झाले आहेत.

मंत्रिमंडळातील एकूण तीन सदस्य आजारी असून ते मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळे आता खातेबदलासाठी भाजपच्या एका मोठ्या गटाकडून मागणी होत आहे. मात्र पर्रीकर यांनी अजून तरी आजारी मंत्र्यांच्या खातेबदलाबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही.

काहीच दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे जेव्हा तिसऱ्यांदा अमेरिकेत उपचारासाठी गेले होते तेव्हा ‘पर्रीकरांनी आरोग्याच्या कारणामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे आणि आता दुसरा मुख्यमंत्री नेमला जावा’, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली होती. पर्रीकरांच्या सतत खालावणाऱ्या प्रकृतीमुळे भाजपने आता पूर्णवेळ तंदुरुस्त मुख्यमंत्री नेमावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली होती.

Related posts

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

Aprna

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

Aprna

शरद पवारांनी बोलावली बैठक

News Desk