HW News Marathi
राजकारण

तेलंगणातील पहिली तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता

हैदराबाद | तेलंगणा राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. या राज्यातील पहिल्यांदाच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) उमेदवार निवडणूक लढविणारा उमेदवार मंगळवार(२८नोव्हेंबर) पासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रमुखी असे या उमेदवाराचे नाव असून चंद्रमुखी या बहुजन डाव्या आघाडीच्या उमेदवार आहे.

हैदराबादमधील गोशमहल मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मुकेश गौड यांचे तगडे आव्हान आहे. याचबरोबर, भाजपचे टी. राजा आणि टीआरएसचे प्रेम सिंह राठोड याच मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, मंगळवारपासून चंद्रमुखी त्यांच्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. तेलंगणा पोलीस चंद्रमुखी यांचा शोध घेत आहेत. तसेच येत्या ७ डिसेंबरला तेलंगणातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता बिहारमध्ये शिवसेनेचे एनडीएला खुले आव्हान

News Desk

मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?

swarit

मुलायम यांनी २०१४ मध्ये देखील असेच विधान मनमोहन सिंग यांच्यासाठी केले होते !

News Desk
राजकारण

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर जोरदार टीका केली आहे. ‘राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा कायदा आणण्याचा विचार आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडचण होत आहे’ असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि न्यायाधीशांनी काहीही केले असून न्यायालय या प्रकरणी गंभीर नाही. मंगळवारी (२७ नोव्हेंबर) पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जोशी फाऊंडेशनच्या वतीने ‘राम जन्मभूमीवर अन्याय का?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या सदस्यांनी न्याय नाकारल्याने आमच्या वेदना वाढत आहेत. ‘जर तुम्ही न्याय द्यायला तयार नसाल तर न्यायाधीश पदावर आपण रहावं की राजीनामा द्यावा याचा विचार त्यांनी करायला हवा’, अशा शब्दांत अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे. देश इतका अपंग झालाय का? की, दोन-तीन न्यायाधीश देशातील लोकांचा विश्वास, लोकशाही, संविधान आणि मूलभूत अधिकारांना थांबवू शकतात.’ असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

Related posts

मला आजही पंतप्रधान मोदींची जात माहित नाही !

News Desk

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit

मोदी सरकारला लष्कराच्या इतिहासाबाबत माहिती नाही !

News Desk