HW News Marathi
राजकारण

प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यास काँग्रेसचा पाठिंबा ?

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील करत आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघात आंबेडकरांना पाठिंबा दिल्याची माहिती मिळाली आहे. आंबेडकरांना पाठिंबा देऊन राज्यभरात दलित मते मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु अद्याप यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमसोबत युती केलेल्या भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने अकोल्यात पाठिंबा दिल्याची माहिती मिळाली आहे.

आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमसोबत हातमिळवणी केली आहे. यानंतरही काँग्रेसकडून आंबेडकरांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, त्यांनी एमआयएमलादेखील महाआघाडीत घेण्याची अट घातली होती. ही अट काँग्रेसने अमान्य केली आहे. भाजपला सत्तेपासून रोखायचे असल्यास धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे लागेल, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांना वाटते. त्यामुळेच काँग्रेसकडून आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश व्हावा, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी प्रयत्नशील आहेत. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांबद्दल आंबेडकरांनी गेल्याच आठवड्यात शंका उपस्थित केली होती. आंबेडकर म्हटले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेला महाआघाडीचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे टीका केली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे लोकसभेचे जागावाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे आम्हाला आघाडीत घेण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्न हा निव्वळ दिखावा असल्याचे आंबेडकर म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाधवांची भेट घेणे ठाकरेंनी नाकारले

News Desk

क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

Manasi Devkar

सीबीआय हे जणू भाजप सरकारचे कुत्रे !

News Desk
देश / विदेश

काबुल येथील सरकारी कार्यालयावर दहशतवादी हल्ला

News Desk

नवी दिल्ली | काबुल येथील सरकारी कार्यालयावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात ४३ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर जवळपास ३५० लोकांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच अफगाण सुरक्षा दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले.

अफगाण सुरक्षा दलाचे जवान आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत अफगाण सुरक्षा दलांच्या जवानांना ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश आले आहे. दहशतवाद्यांकडून काबुल येथील या सरकारी कार्यालयाजवळ कारबॉम्बचा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटानंतर भीतीने इतरत्र पळणाऱ्या लोकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. हा दहशतवादी हल्ला या वर्षी अफगाणिस्तानमध्ये झालेला सर्वात भीषण हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.

Related posts

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू होणार, अमित शाहांची मोठी घोषणा

News Desk

काँग्रेसला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम, राऊतांचा काँग्रेसशी ‘सामना’!

News Desk

पेट्रोल १९ पैसे तर डिझेल २० पैशांनी स्वस्त

News Desk