HW News Marathi
राजकारण

पश्चिम बंगालमधील आताची सरकारही एका व्यक्तीसाठी चालवली जाते !

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (२३ मार्च) पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. राहुल यांनी बंगालमधील मालदा येथून प्रचाराला सुरुवात केली आहे. राहुल यांनी ‘पश्चिम बंगालमधील आताची सरकार ही फक्त एका व्यक्तीसाठी चालवली जाते.’, अशी शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीना टोला लगावला आहे.

“पश्चिम बंगालमध्ये गेली अनेक वर्ष तुम्ही माकपचे सरकार पाहिले. त्यानंतर तुम्ही ममताजींना निवडणून दिले. जो अत्याचार माकपच्या सरकारने केले होते. तोच अत्याचार आता ममता बॅनर्जींच्या सरकारने सुरू ठेवला आहे. त्यावेळीची सरकार एका संघटनेसाठी काम करत होती. तर आताची सरकार एका व्यक्तीसाठी चालवली जाते.

इथेही तरुणांना रोजगार मिळालेला नाही. शेतकऱ्यांना मदत मिळालेला नाही. एकीकडे नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खोटी आश्वासने दिली आहेत”, अशा शब्दात राहुल यांनी प्रसार सभेत दोघांवर टीकास्त्र सोडेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात शरद पवार यांचा दुष्काळी दौरा

News Desk

गोड बोलून त्यांनी आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला !

News Desk

पीएम मोदींच्या हस्ते ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’चे लोकार्पण, बुलेटप्रूफ जॅकेटवरून काँग्रेसवर टीका

News Desk