HW News Marathi
राजकारण

फडणवीसांच्या कार्यकाळात तब्बल ६५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा

नागपूर | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात तब्बल ६५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचे कॅगकडून सांगण्यात आल्याची माहिती देत आमचे सरकार या प्रकरणाची दखल घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, तब्बल जवळपास ७२ हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मिळालेल्या क्लीनचिटच्या पार्श्वभूमीवर देखील जयंत पाटील यांनी यावेळी भाष्य केले. “फडणवीसांनी पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला म्हणजेच अजित पवार निर्दोष आहेत हे त्यांना माहित होते”, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. तसेच, आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरचा दिवशी शेतकरी कर्जमाफी प्रकरणी विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

“आमचे सरकार ‘चौकशी सरकार नाही’. मात्र, जे रेकॉर्डला आहे त्याची दखल आम्ही घेणार आहोत”, असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, आता फडणवीसांच्या अडचणीत मोठी होण्याची शक्यता आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ६५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवरून कॅगकडून सरकारवर ताशेरे देखील ओढण्यात आले आहेत. सरकार याची दखल घेणार आहे”, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. नागपूर येथील राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारवर हे आरोप केले आहेत.आता देवेंद्र फडणवीस याला कसे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ममतांसाठी ‘ही’ तज्ञ व्यक्ती आखणार निवडणुकांची रणनीती

News Desk

ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध

News Desk

दिग्गज नेत्यांच्या भाषेची पातळी घसरली, महाराष्ट्रात ‘चड्डी’चे राजकारण

News Desk