HW News Marathi
राजकारण

मी निवडणुकीपूर्वीच आर्ट अटॅक येऊन मेलो का नाही | चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना त्यांच्या संपूर्ण ३१ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून खैरे यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान, या पराभवाच्या पार्श्वभूमीवर खैरे यांनी अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली आहे. “मी निवडणुकीपूर्वीच आर्ट अटॅक येऊन मेलो का नाही”, असे भावनिक वक्तव्य खैरे यांनी केले आहे. औरंगाबादमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात चंद्रकांत खैरे बोलत होते.

“शिवसेनेत संघटनात्मक बदलाची आवश्यकता आहे. ज्यांना ज्यांना मी मोठं केलं त्यांनी माझ्याविरोधात काम केलं, याचं दुःख वाटत”, असेही चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले. चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना या लोकसभेत पत्करावा लागलेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. खैरे यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांना अशा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे खैरे यांनी आपल्या या पराभवाबाबत आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील खैरे यांच्या अनपेक्षित पराभवाबाबत प्रतिक्रिया दिली होती. “मला माझे जावई पडल्याचे जेवढे दुःख नाही तेवढे चंद्रकांत खैरे पडल्याचे दुःख वाटते”, असे रावसाहेब दानवे म्हणाले. “मी स्वतः म्हटले होते की चंद्रकांत खैरे निवडून येतील. मात्र, काही राजकीय गणिते चुकीची निघतात”, असेही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, धनंजय मुंडेंना धस यांचा इशारा

News Desk

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

संजय राऊतांनी हक्कभंग नोटीसला दिले उत्तर; पत्रात म्हणाले…

Aprna