HW News Marathi
राजकारण

शिवस्मारकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही | धनंजय मुंडे

नाशिक | शिवस्मारक हा राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतांनाही सरकार त्याबाबत गंभीर नाही म्हणूनच त्याचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली, असा गंभीर आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुस-या टप्याची सुरुवात आज (१६ जानेवारी) नाशिक येथून झाली आहे. त्याआधी नाशिक येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

शिवस्मारकाचे काम थांबवण्यात आल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना मुंडे म्हणाले की, हा विषय न्यायालयीन वादात अडकू नये याची काळजी घ्या हे मुख्यमंत्र्यांना याआधीच सांगितले होते. याच्या निविदा प्रक्रियेतही घोटाळा झाल्याची तक्रार खुद्द समितीच्या अध्यक्षांनी विनायक मेटे केली होती. केवळ ४-४ वेळा भूमिपूजन करून दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने जनतेच्या भावनेचा हा विषय गांभीऱ्यांने हाताळला पाहिजे.

महागाई ,नोटाबंदी, जीएसटीमुळे सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. समाजातील सर्व घटक उद्ध्वस्त झाला आहे. परिर्वतन यात्रेच्या दरम्यान लोकांच्या मनात एक असंतोष राग निर्माण झाले असल्याचे चित्र दिसत आहे. हा राग असंतोष जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा त्याचे मतांमध्ये परिवर्तन होते, याचा फायदा आघाडीला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाणारबाबत या सरकारमध्ये पूर्वीपासून संभ्रम आहे. नाणारची जागा बदलली जाणार असल्याच्या बातम्या आता प्रसारित होत आहे. राज्य सरकारमध्ये पोरखेळ सुरू आहे. सरकारचा नियोजन शून्य कारभार सुरू असल्याचे ते म्हणाले. शासकीय दिनदर्शिकेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचा उल्लेख आहे. परंतु तुकोबाचा जयंतीचा उल्लेख नाही, संत नामदेव यांच्या जयंतीचा का उल्लेख नाही असा सवाल उपस्थित करून सरकार महापुरुषांचा अवमान करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : पहिल्यांदाच सोशल मीडियावर आचारसंहिता लागू

News Desk

निवडणुकी आधी बंद दाराआड युतीची चर्चा

News Desk

अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही?

News Desk