HW News Marathi
राजकारण

आता धनगर आरक्षणावरून सरकारची कोंडी ?

मुंबई | मराठा आरक्षणाचे विधेयक आज अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. या दोन्ही सभागृहात विरोधकांकडून मराठा आरक्षणाच्या या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. आता मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारची कोंडी करण्याचा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन ३ महिने होऊनही सरकारने यावर अद्याप एटीआर आणला का नाही ?, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहेत, त्या पद्धतीचा हा धनगर आरक्षणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातील काही बाबींची पूर्तता करून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला देखील आरक्षण देण्यात येईल. आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही धनगर आरक्षणाचा एटीआर आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत सादर करु, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज संध्याकाळी जाहीर होणार नव्या १३ मंत्र्यांची खाती

News Desk

संघ सोडल्यानंतर ख्रिश्चनांबाबत सुभाष वेलिंगकरांची मवाळ भूमिका

News Desk

भाजप सरकारने तोट्यातल्या कंपनीसाठी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकू नये | संजय निरुपम

News Desk
राजकारण

#MarathaReservation : हा तर माझाच विजय | राणे

News Desk

सावंतवाडी | मराठा समाजाच्या आरक्षण विधेयकाला आज (२९ नोव्हेंबर) दोन्ही सभागृहात एकमताने मंजुरी मिळाली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून श्रेय घेण्याची लढाई सुरू झाली आहे. आघाडी सरकारने आरक्षणासाठी राणे समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु ते न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र आता मागीसवर्गीय अहवालाने दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय असल्याचे राणेंनी म्हटले.

तसेच नारायण राणे यांचे चिरणजीव नितीश राणे यांनी ट्टिव करून म्हटेल की, “मराठा आरक्षण दिल नाही..मराठा समाजाने ते मिळवल! ५८ मोर्चे…१४६०० मुलांनी पोलीस केसेस घेतल्या…४२ लोकांनी बलिदान दिले!! शेवटी राणे समितीचा अव्हाल नाव बदलून स्वीकारायला लागलेच! अखेर सरकारला मराठा समाजाच्या समोर झुकावच लागल! एक मराठा लाख मराठा,”

या श्रेयाच्या लाढाईत शिवसेना देखील मागे राहिली नाही. सेने देखील ट्विट करत “उद्धव साहेबांच्या दूरदूष्टीमुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर” झाल्याचे म्हटले आहे.

बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास आली आहे.

Related posts

…तर तो दिवस ठरला, प्रश्न ठाकरेंचे उत्तर पवारांचे

swarit

विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही !

News Desk

सातव्या वेतन आयोगाचे ‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का ?

News Desk