HW News Marathi
राजकारण

सत्ताधारी नेते इतिहास बदलतील यात जराही शंका नाही म्हणूनच…!

मुंबई | “सद्यस्थिती पाहिल्यानंतर सत्ताधारी नेते आपला इतिहास बदलतील याबाबत मला जराही शंका नाही”, असे उपहासात्मक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये भारत भालके यांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळी, शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना हा उपहासात्मक टोला लगावला आहे. “सत्ताधारी भाजपचे नेते इतिहास बदलतील याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही. म्हणून, आता त्यांना सत्तेपासून दूर ठेवायला हवे”, असा टोला शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला आहे. त्याचप्रमाणे, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.

“राज्य सरकारने अरबी समुद्रात ३ वर्षांत शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, गेल्या ५ वर्षांत काहीही काम झाले नाही. आता गड-किल्ल्यांवर दारूचे अड्डे आणि डान्सबार सुरू करण्याचा घाट घातला जातो आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी आश्वासनांशिवाय दुसरे काहीही दिले नाही. राज्यातील ही सद्यस्थिती पाहता उद्या हे सत्ताधारी नेते आपला इतिहासही बदलतील याबाबत मला माझ्या मनात शंका नाही. म्हणूनच, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे आहे”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणार

News Desk

इंग्रजांना जाऊन ७२ वर्षे झाली, आता त्यांचे प्रोटोकॉल बंद करा !

News Desk