HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करा

मुंबई | पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत इतर पक्षांकडून टीका होत असतानाच मित्र पक्ष शिवसेनेने मात्र भाजपा ची पाठराखण केली आहे . मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करावी अशी मागणी शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून केली आहे.

  • नेमक काय म्हटलय सामनात

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतेही राजकारण कोणीच करू नये. राष्ट्राचे व राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचे रक्षण व्हायलाच हवे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे . पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांभोवती अभेद्य सुरक्षा कवच उभारणीवर जोर द्यावा लागेल. राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या हत्येतून आपण धडा घेतला पाहिजे. हिंदुस्थानने दोन थोर नेते अशा हिंसाचारात गमावले आहेत. इंदिरा गांधींना खलिस्तानवाद्यांनी तर राजीव गांधींना ‘लिट्टे’ म्हणजे तामिळी अतिरेक्यांनी मारले.

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी मारायचे ठरवले असल्याचे उघड झाले. मात्र या हत्या कटाचा जो उत्सव आपल्या राजकीय मतलबासाठी सुरू आहे तो निषेधार्ह आहे. पुणे पोलिसांनी भीमा-कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. ज्यावेळी या लोकांनी दंगलीचा भडका उडवला त्यावेळी सरकारने काहीच केले नाही. आता सरकारने दंगलीमागच्या हातांना बेड्या ठोकल्या. हेच लोक मोदी-फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार पराक्रम गाजवत आहेत !

News Desk

जाणून घ्या…महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाबाबत

News Desk

#Results2018 : नवज्योत सिंह सिद्धू यांनी केले भाजपचे नामकरण

News Desk
राजकारण

पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, मुख्यमंत्र्यांचा पवारांना सल्ला

News Desk

मुंबई | भाजपा ने सुरु केलेल्या संपर्क फॉर समर्थन या अभियानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला रविवारी मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही,असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना लगावलाय. मुख्यमंत्र्यानी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत पवारांना लक्ष केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी असुन पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात व पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही अस ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगत पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्द्यांवरून पवारांनी सरकारला लक्ष्य केले.

Related posts

विखे पाटील यांचे संपूर्ण कुटुंब आता भाजपमय झाले आहे !

News Desk

अजित पवार अन् शरद पवार आज बारामतीत, कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी होणार चर्चा?

swarit

जेडीयूची बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा, भाजपला धक्का

News Desk