HW News Marathi
राजकारण

अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं !

मुंबई | यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या सत्तासंघर्षानंतर राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले आहे. या शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारधारा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असल्याने हे सरकार टिकेल का ? हा मोठा प्रश्न वारंवार उपस्थित झाला आहे. आता कुठेतरी शिवसेना काँग्रेसमधील हेच वैचारिक वाद प्रकर्षाने समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेतील हा वाद समोर आला. दरम्यान, एकीकडे काँग्रेस-शिवसेनेत हा वाद सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अत्यंत तटस्थ अशी भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या पार्श्वभूमीवर केलेले ट्विट आता चांगलेच चर्चेत आले आहे.

“सितारों के आगे जहाँ और भी हैं, अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं : इक़बाल”, असे ट्विट करत नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांना टॅग केले आहे. त्यामुळे, नवाब मलिक यांचे हे ट्विट आता चांगलेच चर्चेत आले आहे. शनिवारी (१४ डिसेंबर) दिल्लीत वीर सावरकरांबाबत राहुल गांधींनी वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटवर आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत थेट काँग्रेसला इशारादेखील दिला होता. त्याचप्रमाणे, आजही प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याविषयीची आपली नाराजी व्यक्त केली. परंतु, या शिवसेना-काँग्रेसच्या वादात राष्ट्रवादीची भूमिका फारशी स्पष्ट होत नव्हती. त्यातच आता नवाब मालिकांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार, त्यांना शुभेच्छा : संजय राऊत

News Desk

तुम्ही अनेक वर्षे दबावतंत्राचा वापर केला, परंतु रावणराज जास्तकाळ चालत नाही !

News Desk

कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुन्हा कमळासमोरचे बटण दाबा !

News Desk