HW News Marathi
राजकारण

अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं !

मुंबई | यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या सत्तासंघर्षानंतर राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले आहे. या शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारधारा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असल्याने हे सरकार टिकेल का ? हा मोठा प्रश्न वारंवार उपस्थित झाला आहे. आता कुठेतरी शिवसेना काँग्रेसमधील हेच वैचारिक वाद प्रकर्षाने समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेतील हा वाद समोर आला. दरम्यान, एकीकडे काँग्रेस-शिवसेनेत हा वाद सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अत्यंत तटस्थ अशी भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या पार्श्वभूमीवर केलेले ट्विट आता चांगलेच चर्चेत आले आहे.

“सितारों के आगे जहाँ और भी हैं, अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं : इक़बाल”, असे ट्विट करत नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांना टॅग केले आहे. त्यामुळे, नवाब मलिक यांचे हे ट्विट आता चांगलेच चर्चेत आले आहे. शनिवारी (१४ डिसेंबर) दिल्लीत वीर सावरकरांबाबत राहुल गांधींनी वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटवर आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत थेट काँग्रेसला इशारादेखील दिला होता. त्याचप्रमाणे, आजही प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याविषयीची आपली नाराजी व्यक्त केली. परंतु, या शिवसेना-काँग्रेसच्या वादात राष्ट्रवादीची भूमिका फारशी स्पष्ट होत नव्हती. त्यातच आता नवाब मालिकांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला लिहिले पत्र

Aprna

आता विरोधी पक्ष शिल्लकच राहणार नाही कारण…!

News Desk

मोबाईल घोटाळ्यानंतर आता ३२५ कोटींचा फर्निचर घोटाळा

News Desk
राजकारण

महाराष्ट्रातील नेत्यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांची पुस्तके द्यायला हवीत !

News Desk

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वीर सावकरांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यासह देशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विविध स्तरांतून राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील काँग्रेसवर टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे. त्याचप्रमाणे, प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांची पुस्तके भेट दिली पाहिजेत”, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. त्याचप्रमाणे, संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी वीर सावकरांविषयी लिहिलेल्या ओळी देखील पोस्ट केल्या आहेत.

“वीर सावरकरांचे नाव काढले तर आजही या देशातील तरुण पिढी रोमांचित होते. वीर सावरकर आजही या देशाचे हिरो आहेत आणि राहतील. आम्ही या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येकाचे योगदान मानतो. भाजप मानत नसेल पण आम्ही मानतो. तुम्हीही मानायला हवे. त्यांनी केलेल्या क्रांतिकार्याचा अपमान कोणालाही करता येणार नाही. राहुल गांधींनी जे वक्तव्य केले ते दुर्दैवी. मी महाराष्ट्रातील नेत्यांना सांगेन कि त्यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींना भेटले पाहिजे आणि वीर सावरकरांचे साहित्य त्यांना भेट म्हणून दिले पाहिजे. त्यांच्या मनातला जो गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे. तर या देशात सावरकरांच्या नावाने एक नवा संघर्ष, लढण्याची प्रेरणा अनेकांना मिळेल, अशी माझी खात्री आहे”, असे संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

Related posts

५० वर्षे सत्ता टिकविण्याचा संकल्प करा |अमित शहा

News Desk

आमचा शब्द पाळण्यासाठी तर भाजपचा शब्द जुमलेबाजीसाठी !

News Desk

भविष्यकाळात एससी, एसटीचे आरक्षण रद्द करणार का ?

News Desk