HW News Marathi
राजकारण

काही आमदारांना आमिष दाखविण्यास सुरुवात झालेली आहे !

मुंबई | राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या सत्तास्थापनेसंदर्भात सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमताचा कौल दिलेला असताना देखील मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. त्यातच, काँग्रेस-राष्ट्रवादीने “आपण विरोधी पक्षातच बसू” असे स्पष्ट केले आहे. सत्तास्थापनेच्या या संघर्षात भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु असून त्यांच्याकडून अन्य पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सध्या भाजपवर होत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील आता भाजपवर असाच गंभीर आरोप केला आहे. “काही आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे”, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

  • आम्ही विरोधात बसण्याची तयारी केली आहे.
  • भाजपकडून काही आमदारांना आमिष दाखविण्यास सुरुवात झालेली आहे.
  • भाजप-शिवसेनेच्या अंतर्गत काय चर्चा होतात याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.
  • आता जर कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तर इतर सर्व पक्ष एकत्र येतील आणि त्या आमदाराला पराभूत करतील.
  • राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटू शकत नाही.
  • राष्ट्रवादीच्या ज्या कोणाला फ़ुटायचं होतं ते याआधी झालेलं आहे.
  • आता नव्याने निवडून आलेले नवे चेहरे आहेत. लोकांच्या विश्वासास ही लोकं पात्र ठरली आहेत.
  • सत्ता स्थापनेसंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही.
  • आम्ही विरोधी पक्षातच बसणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कावेबाज चीनचा भारताला सर्व बाजूंनी विळखा घालण्याचा प्रयत्न | ठाकरे

News Desk

राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये !

News Desk

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांचा उडता प्रचार

News Desk