HW News Marathi
राजकारण

कोणताही पक्ष १०० टक्के सर्वोत्तम नाही | भागवत

नागपूरदसऱ्याच्या निमित्ताने नागपुरमध्ये आरएसएस कडून शस्त्र पूजा तसेच संचलन करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अनेक विषयांना भागवतांनी हात घातल्याचे पहायला मिळाले. राम मंदिरसाठी कायदा करा असा हि प्रस्ताव त्यांनी मांडला. भागवत म्हणाले की,देशातील कोणताही पक्ष १००टक्के सर्वोत्तम नाही. परंतु जो बरा आहे त्यांना निवडा , राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या पक्षाचा विचार करा. असे बोलताना भागवत यांचा कल भाजपाकडे होता.

जनतेने १०० टक्के मतदान करायला पाहिजे. देशाचे नेतृत्व कोणी करावे प्रत्येकाने ठेवावे. ‘नोटा ‘चा उपयोग करू नये. त्यामुळे अपात्र उमेदवाराला त्याचा फायदा होतो, असे ही भागवत म्हणाले . पक्षीय आणि जाती- पातीच्या राजकारणापासून स्वयंम संघ नेहमीच लांब आहे. उमेदवाराची राष्ट्रीय प्रेम, राष्ट्र भक्ती, राष्ट्रीय एकात्मता पाहूनच उमेदवाराला मतदान करा ,भागवत यांनी सांगितले. सोशल मीडियावर प्रक्षोभकपणे पोस्ट टाकून देशविरोधी अभियान चालविण्याचे काम शहरी नक्षलवादी करत आहेत. राजकीय आंदोलनामध्ये असेच चेहरे आता घुसत आहेत,’भारत तेरे तुकडे होंगे’असे म्हणणारे अनेक जण यात येत आहेत,पूर्वी फक्त माओवादच शहरी होता,असे भागवत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लेखी आश्वसनाचे गाजर ?

News Desk

…तर मग तुम्हाला माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज काय ?

News Desk

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय! – मुख्यमंत्री

Aprna
राजकारण

माजी मंत्री दशरथ भांडे यांचा फडणवीस सरकारला अल्टिमेटम

News Desk

मुंबई। फडणवीस सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली आजवर या सरकारने आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे केवळ आश्वासन दिले मात्र कोणतेही आश्वासन पाळले नाही. फडणवीस सरकारची ध्येय धोरणे भ्रष्ट असून मूळ आदिवासींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही त्यामुळे आदिवासी घटनादत्त अधिकारांपासून आजही वंचित आहे. त्यामुळे आता कोळी महादेव सह इतर आदिवासी जमातींचे प्रश्न तत्काळ निकाली काढा अन्यथा देता की जाता पुनरावृत्ती करून भाजपला सत्तेतून बाहेर पाडू असा अल्टिमेटम माजी मंत्री दशरथ भांडे यांनी फडणवीस सरकारला दिला.

आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्था मुंबई यांच्या वतीने आझाद मैदान येथील धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष शाम सोनकुसरे, कर्नल गाळे, संजय तराळे, रामरावजी अडबोल, एकनाथ जुवार, अनिल फुकट, प्रशांत तराळे, विश्वनाथ तायडे, रमेशदादा बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, विदर्भ मराठवाडा कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातून कोळी महादेव, माना, गवारी, हलबा कोष्टी, ठाकर, टोकरे , मल्हार कोळी, मांनेवर जमातीचे आदिवासी बांधव तसेच भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आमदार लक्ष्मण माने बळीराम शिरसाठ,आदि या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान या धरणे आंदोलनात दशरथ भांडे यांनी त्यावेळच्या बेरार म्हणजेच सध्याच्या वऱ्हाड विदर्भ प्रांतातील कोळी महादेव जमातीच्या समस्यांकडे लक्ष वेधले, याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोळी महादेव जमातीतील लोक पूर्वी बेरार प्रांतात सातपुड्याच्या पायथ्याशी वास्तव्यास होते,मध्या प्रदेश आणि महाराष्ट्राचे विभाजन झाल्यावर बेरार हा भाग महाराष्ट्रात आला. मात्र येथील आदिवासी बांधवांना सरकारने नेहमीच दुर्लक्षित ठेवले. आजही त्यांना अनुसूचित जमातींचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही. वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे ही जमात आपल्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित आहे. तरुणांना रोजगार नाही. जात वैधता मिळत नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. हेच मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना आदिवासींचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी आश्वासन दिले होते मात्र आज केवळ गाजर दाखवत आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकारला देता की जाता चा इशारा देत सत्तेतून खाली खेचले होते तीच पुनरावृत्ती आता भाजपा सरकारच्या बाबतीत करू असा इशाराही भांडे यांनी यावेळी दिला.

प्रमुख मागण्या –

कोळी महादेव सह हलबा कोष्टी, माना, गोवारी, टोकरे, मल्हार कोळी, मंनेवर जमातींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे.

– जात वैधता प्रमापात्र देण्यात यावे.

– अस्तित्वात असलेल्या जात पडताळणी समित्या बरखास्त करून TRTI पुणे येथे सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या तज्ज्ञांचा समावेश नवीन समित्यात करावा.

– आदिवासी खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी.

– जात पडताळणी समितीतील तोतये संशोधन अधिकाऱ्यांना सेवेतून कमी करावे.

– जात पडत समितीत मानव वंश शास्त्रज्ञांचा समावेश करावा.

Related posts

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk

देशाच्या पंतप्रधान फोटो कचरा कुंडीवर ही परिस्थिती भाजपने लावला! – उद्धव ठाकरे

Aprna

हनुमान हे खेळाडू होते !

News Desk