HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षण विधेयकावर विरोधक नाराज

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे याबाबतचे विधेयक राज्य शासनाकडून २८ नोव्हेंबरला विधानसभेत मांडण्यात येणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत आरक्षणाच्या विधेयकाचे प्रारुप ठरवण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. त्याच बैठकीत आरक्षणाच्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यात आला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी आणि गुरुवारी या अहवालावर चर्चा करण्याबाबत सभागृहाला सुचवले आहे.

मात्र या विधेयकावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अहवाल सादर न करताच विधेयक मांडू नये, असे विरोधकांचे म्हणणे आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात एकूण ५२ टक्के आरक्षणाला आणि ओबीसींच्या प्रवर्गाला धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे, असे सुचवण्यात आले आहे. अहवाल सरकारकडे आल्यानंतर तो सभागृहात मांडण्यात यावा, अशी विरोधक मागणी करीत आहेत. ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी ओबीसी नेते आक्रमक झाले असून आमच्या आरक्षणामध्ये वाटेकरी नकोत असेही त्यांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#MeToo : एम. जे. अकबरांवर आणखी एका महिला पत्रकाराचा गंभीर आरोप

News Desk

पर्रिकरांच्या मृत्यूनंतर अशी विधाने करणे योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

News Desk

“मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’,” सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र

Aprna
मुंबई

#26/11Attack : मुंबईतील दहशतवादी हल्ला देश कधीच विसरू शकत नाही!

News Desk

नवी दिल्ली | २६/११चा मुंबई हल्ला संपुर्ण देश कधीच विसरू शकत नाही, आणि त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम देशाचे संविधान करणार आहे. मी संपुर्ण देशवायी यांना विश्वास देतो की, काँग्रेसने भाजपच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर संपुर्ण देशाला अभिमान वाटत होता. तेव्हा काँग्रेसने आमच्यावर टीका केली होती.

मोदींनी या सभेत मुंबईमधील २६/११ दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली आहे. २६/११ हल्ल्याने संपुर्ण देश हदरून गेला होता. त्यावेळी काँग्रेस राजकीय ध्येय साधण्यात व्यस्त होती. २६/११वरी दिल्ली ही रिमोट कंट्रोलवरून चाल होते. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असून देखील २६/११ मुंबईत दहशतवादी हल्ला करून आपल्या देशातील लोकांना आणि जवानांना गोळ्या घालून ठार केले होते. आज (२६ नोव्हेंबर)ला १० वर्ष पुर्ण झाले आहेत.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये भीलवाड जाहीर सभेत काँग्रेस पार्टीवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, काँग्रेस पार्टी मोदींची जात काय आहे ? जेव्हा देश पतंप्रधान परदेशात जातात. तेव्हा त्या देशातील लोकांना एकच जात दिसते आणि ती म्हणजे जे देशातील सव्वाशे कोटी हिंदुस्थानातील जनतेची आहे. तसेच पुढे मोदी असे देखील म्हणाले की,” मी कधी सुटी घेतली आहे हे तुम्ही कधी ऐकले का? किंवा मी आठवडाभरासाठी कुठे तरी गेलो आहे, असे तुम्ही कधी ऐकले का?”

पुढे मोदी यांनी म्हटले की, २०१४मध्ये आमची सरकार येण्याआधी शौचालयची सुविधा ४० टक्के देखील नव्हती. परंतु आमच्या ४ वर्षात मोदींने ४० टक्केहून ९५ टक्के इतपत देशभरात शौचालय बांधण्यात आले आहेत.

 

Related posts

यंदा गणेशोत्सव मंडळांना पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

News Desk

ओला-उबेर चालक असंख्य मागण्यासाठी रस्त्यावर, बेमुदत बंदचा इशारा

swarit

गायक नितीन बाली यांचे निधन

Gauri Tilekar