HW News Marathi
राजकारण

राममंदिर प्रकरणी शशी थरूर यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | कोणत्याही ख-या हिंदू व्यक्तीला दुस-याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधले जावे असे वाटणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे. अयोध्या येथील राम मंदिरप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी असे वक्तव्य करून स्वतःवर पुन्हा नवा वाद ओढवून घेतला आहे. चेन्नई येथील ”द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018” या आयोजित कार्यक्रमादरम्यान शशी थरूर बोलत होते. “हिंदू अयोध्येत भगवान रामाचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे कोणत्याही ख-या हिंदू व्यक्तीला दुस-याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधले जावे, असे वाटणार नाही”,असे थरूर म्हणाले.

शशी थरूर हे वारंवार त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि ट्विट्समुळे चर्चेत राहत असतात. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होते. काहीच दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींविरोधात एक ट्विट केले होते. यावेळी त्यांनी मोदींवर टीका करण्यासाठी floccinaucinihilipilification हा शब्द वापरला होता. नेटिझन्सना या शब्दाचा अर्थ न समजल्याने तसेच हा शब्द उच्चारणे देखील मोठे अवघड झाल्याने शशी थरूर यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर आता काही दिवसांत पुन्हा शशी थरूर यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे ज्यामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो.

राम मंदिर तयार होऊ नये अशी त्यांची इच्छा !

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. “अयोध्येत राम मंदिर तयार होऊ नये अशीच काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. म्हणूनच काँग्रेस नेते वारंवार असे वादग्रस्त विधाने करत असतात. ते समाजापर्यंत देखील असाच संदेश पोहोचविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असे भाजप नेते नरसिंहा यांनी म्हटले आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजिद मेमन यांच्याकडून शशी थरूर यांच्या या विधानाचे समर्थन केले गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डागळलेली प्रतिमा असलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणे चुकीचे! – अजित पवार

Aprna

आज राज्यसभेतही सवर्णांच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर होईल, अशी आशा !

Gauri Tilekar

मनसेला सोडून गेलेल्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार फैसला

News Desk
राजकारण

घरपोच दारु पोहोचविण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवा !

News Desk

मुंबई | घरपोच दारु नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा, असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला लावला आहे. ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देऊन, दारुच्या होम डिलिव्हरीला ग्रीन सिग्नल देणाऱ्या राज्य सरकारवर घणाघाती हल्ला करणारे पत्रक ठाकऱ्यांनी काढले आहे.

या पत्रकात उद्धव ठाकरे म्हणाले की, “घरपोच ऑनलाईन दारु पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक आहे. घरपोच दारुच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा.”

तसेच ऑनलाईन दारु देणे ही आपल्या संस्कृतील अशोभनीय आहे. परंतु राज्याची ‘शोभा’ करण्याचे प्रकार रोजच सुरू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. मंत्री फिरत आहेत. त्यांचे अहवाल येतील, तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होतील. दुष्काळाग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका. त्यांना घरपोच दारू नकोय तर मदत हवीय, शब्दात ठाकरेंनी निशाणा साधला.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…मुंबई उत्तर मतदारसंघाबाबत

News Desk

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

प्रांतीय अस्मितेचे जनक बाळासाहेब ठाकरेच !

News Desk