HW News Marathi
राजकारण

पदवीचे वाद तो सर्व बाबतीत बाद !

मुंबई | राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे शंभर अपराध पूर्ण झाल्याने त्यांनी स्वतः हुन राजीनामा द्यावा,अशी मागणी वारकरी साहित्य परिषद मराठवाड्याचे अध्यक्ष ह.भ.प.ॲड दत्ता महाराज आंधळे यांनी केली आहे. संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या विषयी वाटेल ते छापले गेले. तसेच धर्मवीर श्री शंभाजीराजे यांच्या विषयी चूकीचा मजकूर छापून ..स्वतः चे “विनोद ” नाव सार्थकी लावले. असे म्हणत ज्यांचे पदवीचे वाद तो सर्व बाबतीत बाद असलेला व्यक्ती असून मंत्री विनोद तावडेंनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी आंधळे महाराजांनी केली आहे.

यापूर्वी मराठीच्या पाठ्यपुस्तकातून वारकरी संतांचे वाङमय तावडेंनी हद्पार केले. त्यावेळी ॲड.आंधळे महाराज यांनी प्रथम आवाज उठविला होता. अंजली ओक तसेच नितीन ओक, राजाभाऊ चोपदार या वारकऱ्यांनी माझी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, विनोद तावडेंना भेटले त्या तावड्यांनी जे उद्गार काढले ते ऐकून तो किती लायकीचा मंत्री हे कळले होते असेही आंधळे महाराज म्हणाले आहेत.

आता तर संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी विषयी वाटेल ते छापले गेले. स्वतःच्या नावाचा त्यांनी “विनोद ” केला आहे. मंत्री विनोद तावडेंनी ताबडतोब राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी संत वाङमयाचे उपासक तथा संशोधक ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#RamMandir : काँग्रेसने पाठिंबा दिला तर २ मिनिटांमध्ये अयोध्येत राम मंदिर बनेल !

News Desk

आपण एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk
राजकारण

निवडणुकांसाठी मोदींचे हे खालच्या पातळीचे राजकारण | निरुपम

Gauri Tilekar

मुंबई | भाजप सरकारने सुरु केलेली आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जिचे आता ‘मोदी केयर’ नावाने नामकरण करण्यात आलेले आहे, ती आगामी निवडणुकांमध्ये जनतेला मूर्ख बनवून मते मिळवण्यासाठी तयार केलेले मृगजळ आहे. निवडणुकांसाठी मते मिळविण्यासाठी नरेंद्र मोदी किती खालच्या पातळीचे राजकारण करू शकतात हेच यावरून दिसून आले, अशा कठोर शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, ‘मोदी केयर‘ या योजनेसाठी जे पात्रतेचे निकष आहेत, पूर्णतः चुकीचे आहेत. सुरुवातीला भाजप सरकारतर्फे घोषणा करण्यात आली होती की, या योजनेंतर्गत देशातील ५० करोड नागरिक आणि १०.७४ करोड कुटुंबे, ज्यांना २०११ च्या सामाजिक आर्थिक वर्ग आणि जाति जनगणना (एसईसीसी) मध्ये ‘वंचित’ म्हणून वर्गीकृत केलेले आहे. अशा कुटुंबांना हॉस्पिटल्स मध्ये ५ लाख रुपयांपर्यंत कॅश लेस इलाज दिला जाईल.

पण आज सरकारने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जे पात्रतेचे निकष ठेवले आहेत. ते सरकारने केलेल्या घोषणेशी मेळ खात नाही. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने जी अट ठेवली आहे, त्यानुसार ज्या लोकांच्या घरात फ्रिज किंवा मोटारसायकल आहे किंवा ज्या परिवारांचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आज फ्रिज किंवा मोटारसायकल आज देशातील सर्व कुटुंबांची मूलभूत गरज झालेली आहे. तरीसुद्धा ‘मोदीकेयर’ योजनेसाठी असे पात्रता निकष लावण्यामागचे कारण एकच आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मोदीकेयर’ च्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवून जनतेची मते घेऊ पाहत आहेत. गरिबांची मते मिळवण्यासाठी केलेले हे अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. ही देशातील गरीब जनतेची आणि त्यांच्या गरिबीची केलेली क्रूर थट्टा आहे.

Related posts

चले जाओ मोदी

News Desk

हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा! – उद्धव ठाकरे

Aprna

२०१९ साल संपण्यापूर्वी राम मंदिराचे काम सुरू करावे !

News Desk