HW News Marathi
राजकारण

उत्तर भारतीयाला मारहाण केल्याप्रकरणी ३ शिवसैनिकांना अटक

मुंबई । दादरमधील प्रभादेवी परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय तरुणाला काल (२५ ऑक्टोबर) मारहाण केल्याची घटना समोर आली होती . रस्त्यावर स्टॉल लावण्याच्या वादातून शिवसैनिकांनी उत्तर भारतीय तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी ३ शिवसैनिकांना दादर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शाखाप्रमुख शैलेश माळी आणि शिवसैनिक दिनेश पाटील, शेखर भगत अशी नावे आहेत. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव विशाल पांडे असे आहे. विशाल पांडेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही घटना उघडकीस आली.

ही मारहण स्टॉल लावण्यावरून झाली आहे. विशालने सिद्धिविनायक मंदिराच्या मागे फ्रँकीचा स्टॉल लावला होता. परंतु दुसऱ्या दिवशीच काही शिवसैनिकांनी विशालला स्टॉल का लावला, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि त्याचा स्टॉल तोडला. स्टॉलची तोडफोड केल्यानंतर शिवसैनिकांचे मन शांत झाले नाही, तर त्यांनी विशालला बांबूच्या काठीने मारहाण करत प्रभादेवीतील उर्वशी बिल्डिंगमध्ये विशालच्या घरात घुसून मारहाण करत होते. विशाला वाचवण्यासाठी पुढे आलेला त्यांचा भाऊ निखाल पांडे देखील मारहाण करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रकाश आंबेडकरांच्या अल्प प्रतिसादामुळे विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीच एकत्र !

News Desk

एकाही आमदार, खासदाराला राज्यात फिरू देणार नाही !

swarit

लोकसभेत शिवसेनेच्या 18 खासदारांना भावना गवळींनी दिलेली व्हिप लागू होणार! – एकनाथ शिंदे

Aprna
देश / विदेश

मतदार नोंदणीची तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावी !

News Desk

मुंबई | समाजवादी पार्टीचे मुंबई/महाराष्ट्र अध्यक्ष अबू आसिम आजमी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदार नोंदणीची तारीख ३० नोव्हेंबर, २०१८ पर्यंत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अबू आजमी यांनी पत्रामध्ये लिहिले आहे कि निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या मतदार नोंदणी अभियानाला जनतेकडून समर्थन भेटत असून नवीन मतदार उत्साहाने मतदार यादीमध्ये नाव नोंदवीत आहेत.

या अभियानाला राजकीय पक्षासह अनेक सेवा भावी संस्थाचे हि सहकार्य मिळत आहे. आजमी ने निवडणूक आयोगाच्या अभियानाची प्रशंसा करत म्हणाले आहे कि अभियानामुळे कोणताही मतदार मतदानापासून नाही राहू शकत. परंतु अभियानासाठी ३१ ऑक्टोंबर, २०१८ पर्यंत ची वेळ देण्यात आली असून मात्र अभियान संपण्यासाठी ७ दिवस बाकी आहे पण अद्यापही काही मतदार नोंदणी करू शकले नाहीत. यासाठी अबू आजमी यांनी निवडणूक आयोगाला मागणी केली आहे. कि मतदार नोंदणीची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर पर्यंत करण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना मतदान यादीमध्ये नाव नोंद करता येईल.

Related posts

#MahatmaGandhi : महात्मा गांधींच्या हत्येबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी

swarit

चांद्रयान -२ मोहिमेची तारीख जाहीर, २२ जुलैला अवकाशात झेपावणार

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे एक वेगळाच विक्रम !

News Desk