HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे मुंबईत दाखल, शिवसैनिकांनी केले जंगी स्वागत

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अखेर त्यांच्या अयोध्या दौऱ्याहून मुंबईत परतले आहेत. शिवसैनिकांकडून मुंबई विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावरून उद्धव ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा अवघ्या २४ तासांमध्ये संपला असून ते आता अयोध्येहून मुंबईला परतले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला आहे. मात्र त्यांनी अयोध्येतील जनतेशी संवाद साधलेला नाही. खरंतरं, उद्धव ठाकरे रविवारी पत्रकारांशी आणि त्यानंतर अयोध्येतील जनतेशी हिंदीतून संवाद साधणार होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुवाहाटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रवी राणांची दिलगिरी; तर बच्चू कडू उद्या भूमिका मांडणार

Aprna

नितीन गडकरी रुग्णालयात दाखल

News Desk

भारतीय जवानांच्या फोटोचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करून नये | निवडणूक आयोग

News Desk
राजकारण

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सर्व सरकारी सुविधा

News Desk

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनी सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा नाकारल्या आहेत. आम्ही सक्षमपणे आमच्या कुटुंबाचा खर्च भागवू शकतो.आम्हाला सरकारी सुविधांची आवश्यकता नाही, अशा आशयाचे पत्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयास पाठविले आहे.

देशाच्या माजी पंतप्रधानांच्या कुटुबीयांस एसपीजी सुरक्षेसह आणखी अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. मात्र, अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनी सरकारकडून मिळणाऱ्या या सर्व सुविधा घेण्यास नकार दिला आहे. अटल बिहारी वायपेयी यांच्या पश्चात त्यांची दत्तक मुलगी नमिता, जावई रंजन भट्टाचार्य, मुलगी निहारिका असे कुटुंब आहे.

Related posts

मिशन दापोली साई रिसॉर्ट!, अनिल परबांविरोधात सोमय्या हातोडा घेऊन सज्ज

Manasi Devkar

सभेच्या वेळी कोणी लाईट आणि केबल कनेक्शन तोडणाऱ्यांना तुडवा | राज ठाकरे

News Desk

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया! – मुख्यमंत्री

Aprna