HW News Marathi
राजकारण

लाज कशी वाटत नाही ? हा प्रश्न काॅंग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांनाच विचारत आहेत !

मुंबई | काॅंग्रेसने आज (२ एप्रिल) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पंत्रकार परिषद घेत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. लाज कशी वाटत नाही ? हा प्रश्न काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकमेकांनाच विचारत असल्याचे म्हणत विनोद तावडे यांनी महाआघाडीच्या टॅग लाईनची देखील खिल्ली उडवली आहे. इतकेच नव्हे तर तावडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देखील तोंडसुख घेतले आहे. “पृथ्वीराज चव्हाण म्हणतात कि मोदी पंतप्रधान होणार नाहीत तर मग पंतप्रधान कोण होणार हे त्यांनीच जाहीर करावे”, असा टोला विनोद तावडे यांनी लगावला आहे.

विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • काॅंग्रेस पक्षाचे अभिनंदन कारण त्यांना पुण्यात उमेदवार मिळाला, मला धाकधूक होती.
  • इतके दिवस राष्ट्रवादीच्या दबावाखाली गायकवाडांचा प्रवेश करून पुण्याची उमेदवारी का थांबली होती ? काॅंग्रेस कोणाच्या दबावाखाली होती ?
  • मोदींना कुटुंब आहे, मोदींना भाऊ आहेत ते आपल्या पुतण्यासाठी काय करतात हे माहीत आहे. काका पुतण्यासाठी काय करतो हे ही सगळ्यांना माहिती आहे. सुप्रिया सुळेंनी चिडचिड करू नये.
  • पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. मग पंतप्रधान कोण होणार हे त्यांनीच जाहीर करावे असे माझे आव्हान आहे.
  • ‘गरिबीवर वार वाड्रा मालदार” ही काँग्रेसची घोषणा आहे
  • ‘हम करेंगे’मध्ये नेमके नेतृत्व कोणाचे ?
  • ‘लाज कशी वाटत नाही ?’ हे राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस एकमेकांना विचारत आहेत महाआघाडीच्या टॅगलाईनवर टीका
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता विरोधी पक्ष शिल्लकच राहणार नाही कारण…!

News Desk

…म्हणून नवज्योतसिंह सिद्धूंनी घेतली राहुल गांधींची भेट

News Desk

युतीच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या कि तिथली गर्दी कशी ओसरते बघा !

News Desk