HW News Marathi
राजकारण

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी झालेल्या स्पीडबोटच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवसंग्रामचे संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यावर अजित पवार यांनी आरोप केले आहेत. ‘विनायक मेटेंना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का ?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे.

स्पीड बोटीच्या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांना कोणतीही कल्पना न देता कंत्राटदार आणि सल्लागारांनी स्मारकाच्या रचनेत स्वतःला हवेत तसे बदल केले आहेत, असा गंभीर आरोप केला होता. मेटे यांनी शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली होती. चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला होता.

दरम्यान, या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘शिवस्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत आहे’, असा आरोप केला होता.

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीड बोटचा काल (बुधवार) एका खडकाला आदळून अपघात झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यसचिव देखील या बोटीतून प्रवास करत होते. पहिल्यांदा बोटीतील सर्वच जण सुखरूप असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर १ व्यक्ती बेपत्ता असल्याचे लक्षात आले. ती व्यक्ती बुडाल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती. त्यानंतर काही वेळात त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश पवार असे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रदेशाध्यक्षपदी सिंधिया यांना नियुक्त करा, अन्यथा राजीनामे देऊ !

News Desk

मि जातीपातीसाठी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीसाठी लढतोय | राज ठाकरे

News Desk

सर्वोच्च न्यायालयात 20 जुलैला एकनाथ शिंदे सरकारचे भविष्य ठरणार

Aprna
राजकारण

निकषांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करावा | अजित पवार

Gauri Tilekar

मुंबई | सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात १९७२ या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले, राज्यातील भारनियमन बंद करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. केंद्राच्या समितीकडे डोळे लावून वेळकाढूपणा करू नका. विशेष विमानानं पथकाला आणा. असा सल्लाही यावेळी असे अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

तसेच, पुढे धनंजय मुंडेनी बोलताना सरकारच्या धोरणावर टीका केली. जलयुक्त शिवारमुळे १७ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा खोटा आहे, असे ते यावेळी म्हणाले आहेत. जलयुक्त शिवार योजना बोगस असल्याचे सिध्द झाले आहे. जीएसडीएचा अहवाल जलयुक्त फसल्याचे सिध्द होतेयं. साडेसात हजार कोटीचा हिशोब सरकारने जनतेला द्यायला हवा. सरकारने जनतेला फसवले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Related posts

लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Manasi Devkar

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी

Aprna

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयावर आजच सुनावणी होणार

Aprna