HW News Marathi
राजकारण

ठाण्यातून राष्ट्रवादीचे ‘गणेश नाईक’ यांना उमेदवारी मिळणार का ?

ठाणे | शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. काही अपवाद वगळता येथे सर्वच राजकीय पक्षांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा हा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघातून नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत विचार राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

लोकसभेच्या ठाणे मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी दिल्लीत आज होणाऱ्या (१३ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. नवी दिल्लीत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे. ही बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक या बैठीकत उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीत ठाण्यातील राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारची सहानुभूती नाही! – जयंत पाटील

Aprna

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

प्रियांका गांधी गंगेचे पाणी पिऊ शकल्या इतकी गंगा स्वच्छ आहे !

News Desk