HW News Marathi
Uncategorized

“करोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू”

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. “एकीकीडे करोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसूली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसूली करायची आहे. म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे.” अशी टीका महाविकासआघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(१४ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना केली आहे.

जबरदस्ती वसूली करण्यासाठी हा सगळा बाऊ

“उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे सांगितलं, त्यातूनच हे लक्षात येतं की, त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली. पणही जी काही थकबाकी आपण दाखवतो, याच्यामध्ये विशेषता कृषी पंपाच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो. त्यानंतर जो काही आपला तोटा आहे, हा भरून काढण्यासाठी आपल्याला जे टेरिफ मिळतं, त्यामधून हा तोटा आपण भरून काढतो. त्यामुळे मला असं वाटतं की, या ठिकाणी जबरदस्ती वसूली करण्यासाठी हा सगळा बाऊ तयार करण्यात येतोय.” असंही फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही

“आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही हे यातून स्पष्ट झालेलं आहे.” तसेच, “नाना पटोले जे बोलले आहेत, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांनी कुंभकोणी यांना नियुक्त केलं आहे. या सरकारने त्यांना पुन्हा नव्याने नियुक्त केलं आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.” असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UNSC ची अध्यक्षता करणारे मोदी ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

News Desk

राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार

News Desk

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ सुरू 

News Desk