HW News Marathi
Uncategorized

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘या’ कारणांमुळे सोडले घर

नवी दिल्ली | भाजपच्या जेष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपले शासकीय निवासस्थान रिकामे केले आहे. यासंदर्भातील माहिती सुषमा यांनी त्याच्या ट्वीटर हँडलवरून दिली आहे. या ट्वीटमध्ये सुषमा यांनी म्हटले की, “मी माझे अधिकृत शासकिय निवासस्थान सोडलं आहे. मी आता उथून पुढे ८ सफरदरजंग मार्ग, नवी दिल्ली या निवासस्थानी उपलब्ध नसणार आहे. माझा पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक बदलले आहेत.”

सुषमा स्वराज यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुषमा यांनी पक्षाच्या आग्रहानंतर ही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी जयशंकर प्रसाद यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. आता सुषमा यांनी आपले शासकिय निवासस्थानसुद्धा सोडले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने फेटाळला राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk

लंडनमधील वर्ल्ड ट्रेड मार्ट मेळाव्यात महाराष्ट्रातील पर्यटनविषयक प्रदर्शन

News Desk

ग्रामीण विकासात पदविका अभ्यासक्रम

News Desk