HW News Marathi
Uncategorized

कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी,सांगलीत पूरस्थिती आटोक्यात नाही

अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.

कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सायंकाळी आयोजित केलेल्या मदतीच्या बैठकीत ६० स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना उपस्थिती दर्शवत लागेल ती मदत देण्याची ग्वाही दिली.

गेल्या पाच दिवसांत पुराच्या पाण्यामुळे असंख्य दुकाने , रुग्णालये, घरे, नागरिकांच्या पार्किंग केलेल्या चारचाकी, दुचाकी ,आदींचे बेसुमार नुकसान झाले आहे. यात विविध विमा कंपन्यांच्याकरीता सर्व्हेअरचे काम करणाऱ्या जाणकारांकडून सुमारे ४०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत द्या, रुपाली चाकणकरांचे मोदींना पत्र

News Desk

रेल्वेतील अन्न खरंच खाण्यायोग नाही

News Desk

जिओ देणार 99 रूपयात अनलिमिटेड कॉलिंगसोबत 24 जिबी 4 जी डेटा

News Desk