HW News Marathi
Uncategorized

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही !

नवी दिल्ली | स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी केंद्रकडे पाठपुरवठा करणार असल्याचे नमुद केले आहे. लोकसभेत आज (१९ नोव्हेंबर) सावरकरांना भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी सावरकरांना भारतरत्न कधी देणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर केंद्राने लोकसभेत उत्तर दिले की, “सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची गरज नाही, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल,” असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहे.

भारतरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा अशी मागणी केली जात आहे. अनेकांचा सावरकरांना पुरस्कार देण्यावरून विरोध देखील आहे. ‘भारतरत्न’ हे सन्मान देण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. एका समितीची पद्म पुरस्कार देण्यासाठी नियुक्ती केली जाते. पण अशी कोणतीही समिती ‘भारतरत्न’ हा सन्मान देताना नसते. वीर सावरकरचे नाव हिंदुत्ववादी विचारधारेच्या हिंदू महासभेशी जोडलेले गेले होते. महाराष्ट्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. हिंदुत्व विचारधारेशी जोडलेले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सावरकरांना आपला आदर्श मानतात. अनेक हिंदूत्वावादी संघटनांचे कार्यकर्ते सावरकरांना जन्मठेप झालेल्या अंदमान निकोबरमध्ये जाऊन त्यांच्या स्मृतींना उजाळाही देत असतात.

तसेच काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची आपली भूमिका थोड्या दिवसांपूर्वी स्पष्टपणे केली होती. ”काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यवीर सावरकरविरोधी नाही. सावरकरांबाबत आम्हाला आदरच आहे. स्वत: इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे अनावरण केले होते.” अशी आठवणही मनमोहन सिंह यांनी यावेळी सांगितली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शशिकलाची 1400 कोटींची संपत्ती जप्त

News Desk

“मी कधीही फोन उचलून उद्धव ठाकरेंशी बोलू शकतो”, फडणवीसांनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबतचं नातंं!

News Desk

मोठी बातमी! ‘फेसबुक’ने बदललं आपलं नाव, लोगोतही बदल; जाणून घ्या कारण

swarit