HW News Marathi
Uncategorized

सेक्सबाबत पुरूष स्वार्थी असल्याचा महिलांचा आरोप

लंडन: सेक्सच्या बाबतीत पुरुष स्वार्थी असतात. असे या सर्व्हेतून समोर आले या सर्वेत सहभागी झालेल्या बहुतांश महिलांचे हे मत आहे की सर्व पुरूष सेक्स बाबतीत स्वार्थी असतात.,

deccanchronicle.com या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सेक्सची इच्छा निर्माण झाल्यानंतर शरीससुख मिळवताना पुरुषांमधला स्वार्थीपणा दिसून येते. सेक्स करताना पुरुषाला जे समाधान हवे असते तेच सुख आपल्या जोडीदाराला मिळाले पाहिजे याची काळजी पुरुषाने घेतली पाहिजे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे

या अभ्यासातून अनेक महिलांनी व्यक्त केले की, सेक्स दरम्यान पुरुष स्त्रीच्या लैंगिक भावनांचा विचार करत नाहीत. फक्त स्वत:पुरता विचार करतात. तीन पैकी दोन महिलांनी अशाच पद्धतीचे मत व्यक्त केले. पुरुषांना मात्र हा आरोप मान्य नाही. सेक्स करताना जोडीदाराच्या समाधानाला आपले पहिले प्राधान्य असते, असे पुरुषांनी सांगितले. तर याच अभ्यासात पुरुष केवळ स्वत:चा विचार करतात हा समज चुकीचा असल्याचे पुरुषांनी सांगितले. सेक्स करतानाही अनेक पुरुष आपल्यातील पुरुषी अहंकाराची भावना दाखवून देत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. योग्य माहिती आणि जोडीदारांमध्ये संवाद यातून ही समस्या सुटू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धक्कादायक: तरूणीवर दोन दिवस सामूहिक बलात्कार

News Desk

रेल्वेतील अन्न खरंच खाण्यायोग नाही

News Desk

१ रुपयांत घ्या नवा फोन

News Desk
राजकारण

मला सेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, राज्य उभारायचे आहे | उद्धव ठाकरे

Gauri Tilekar

बीड | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीडमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बीडमध्ये भगवा फडकवायचा असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांना थेट इशाराच दिला आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, कारण मला राज्य उभारायचे आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत बहिणीविरुद्ध उमेदवार देणार असे म्हणणाऱ्या उद्धव यांनी यंदा मात्र बीडमध्ये उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोपीनाथ मुंडेंसाठी आम्ही एक एक मतदारसंघ सोडला. परंतु आता मला बीडमध्ये सर्व जागांवर भगव्याचे राज्य पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त काढायचा काय ? असेच सुरु राहिले तर लोकशाही मार्गाने हे सरकार पुढे जाऊ शकेल असे वाटत नाही. देशात आणि राज्यात तब्बल ३० वर्षानंतर हिंदू सरकार आले आहे. परंतु लोकांच्या पदरी निराशाच पडली आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, काल (सोमवारी) केंद्र आणि राज्यात सत्तेत राहून भाजपवरच टीका करणाऱ्या शिवसेनेला भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अल्टिमेटम दिले होते. त्यामुळे आता ‘सत्तेला कधीही लाथ मारू’ असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना याबाबत आता अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले होते. मात्र अमित शहा यांच्या या अल्टिमेटमवर उद्धव ठाकरे यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.

Related posts

“… माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही – गिरीश बापट

swarit

“मी राजीनामा देतो आणि परत निवडून येतो,” आदित्या ठाकरेंच्या टीकेला सत्तारांचे प्रत्युत्तर

Aprna