HW News Marathi
Uncategorized

भगवा दहशतवाद देशात सक्रीय

चेन्नई – कमल हसन हे दक्षिणेतले अमिताभ…ते सध्या अभिनयातून राजकारणात येवू पहात आहेत. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी हिंदू दहशतवादावर केलेलं भाष्य बोलकं आहे. त्यांच्या या भाष्यानं खळबळ उडाली आहे.

उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे’, असा थेट आरोप कमल हसन यांनी केला आहे.

तामिळ भाषेतील साप्ताहिकात कमल हसन यांनी हा स्फोटक लेख लिहिला आहे. ‘हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत’, असं सांगतानाच ‘जनतेचा सत्यमेव जयते’वरील विश्वास उडाला आहे’, असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे. ‘तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे’, असं सांगत त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.

कमल हसन यांच्या या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हसन यांना अत्यंत कठोर शब्दांत लक्ष्य केलं आहे. ‘कमल हसन हे नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. हिंदू दहशतवादा’चा कोणताही पुरावा नाही,’ असं स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही !

News Desk

लोकसभेच्या निकालानंतर अचानक देशातील जनतेचे “चौकीदार” अदृश्य

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला !

News Desk