HW News Marathi
Uncategorized

भगवा दहशतवाद देशात सक्रीय

चेन्नई – कमल हसन हे दक्षिणेतले अमिताभ…ते सध्या अभिनयातून राजकारणात येवू पहात आहेत. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी हिंदू दहशतवादावर केलेलं भाष्य बोलकं आहे. त्यांच्या या भाष्यानं खळबळ उडाली आहे.

उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे’, असा थेट आरोप कमल हसन यांनी केला आहे.

तामिळ भाषेतील साप्ताहिकात कमल हसन यांनी हा स्फोटक लेख लिहिला आहे. ‘हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत’, असं सांगतानाच ‘जनतेचा सत्यमेव जयते’वरील विश्वास उडाला आहे’, असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे. ‘तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे’, असं सांगत त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.

कमल हसन यांच्या या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हसन यांना अत्यंत कठोर शब्दांत लक्ष्य केलं आहे. ‘कमल हसन हे नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. हिंदू दहशतवादा’चा कोणताही पुरावा नाही,’ असं स्वामी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Budget 2019 : सोने-चांदीची खरेदी महागली

News Desk

नाशिकमध्ये एसटी रिक्षा-बसचा भीषण अपघात, मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

News Desk

अमरावती शेतकऱ्याच्या मुलाची इंडियन नॅशनल क्रिकेट टीममध्ये निवड

News Desk
राजकारण

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

News Desk

मुंबई | संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनाअपेक्षित सामाजिक समतेची क्रांती घडविण्याचा मार्ग शैक्षणिक क्रांतीतूनच होईल. त्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी केली नाही तर समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला वाहून घेतले. जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर असल्याचा आम्हाला अभिमान असून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्याने ही संस्था सामाजात झालेल्या शैक्षणिक प्रगतीचा ऐतिहासिक पाया ठरली आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बुद्धभवन येथील सभागृहात आयोजित कर्यक्रमात रामदास आठवले अध्यक्ष म्हणून बोलत होते. रामदास आठवले हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेयरमन आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडले त्यात समाजसेवक, पत्रकार, डॉक्टर , क्रिकेटपटूही घडले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात रामदास आठवले हे सुद्धा विद्यार्थी होते. आज ते केंद्रियराज्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असून पीपल्स एज्युकेशन सोसायटी या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष असल्याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी रिपाइं पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी पी ए सोसायटीचे अशोक तळवटकर, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जी. व्ही.राव, डॉ. जयमंगल धनराज, गौतम सोनवणे, बी के बर्वे, एड आशाताई लांडगे, चंद्रशेखर कांबळे, घनश्याम चिरणकर, सो ना कांबळे, प्रकाश कमलाकर जाधव , सचिन बनसोडे, सचिनभाई मोहिते, शिरीष चिखलकर, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related posts

“आयुष्यातून उठविण्याचे काम युवा सेना प्रमुखांनी केले”, राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Aprna

अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला | उद्धव ठाकरे

News Desk

छगन भुजबळ यांना आपले मतदान केंद्रच सापडेना

News Desk