HW News Marathi
महाराष्ट्र

दापोली-खेड मार्गावर मॅक्झिमो गाडीची डंपरला धडक, ५ जणांचा मृत्यू

रत्नागिरी | दापोली-खेड मार्गावर शुक्रवारी (२८ डिसेंबर) भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि मॅक्झिमोची धडक झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. नारपोली गावाजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तीन जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेलार नामक चालक मॅक्झिमो गाडीतून प्रवासी घेऊन दापोलीकडून खेडकडे येत होता. नारगोली इंद्रधनू बागेजवळ एका गाडीला ओव्हरटेक करताना मॅक्झिमो आणि डंपरची टक्कर झाली. या अपघातात मधुकर गंगाराम कांबळे, जगदिश शांताराम पारदुले, मॅक्झिमो चालक शेलार, महमिदा शेख यांच्यासह अन्य एक महिला असे एकूण पाच जण जागीच ठार झाले.

मृतांमध्ये २ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश झाला असून यात मधुकर कांबळे दापोली नगर पंचायतीचे कर्मचारी आहेत. या अपघातात निलेश पवार आणि संदीप पावसकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईच्या केईएम हलवण्यात आले आहे. जखमी निलेश पवार हाही नगर पंचायतीचा कर्मचारी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याचा आरोप करत सरकारविरोधात भाजप करणार जेलभरो आंदोलन 

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक नेत्याने चक्क कार्यकर्त्याच्या शेतात केली ऊस लावण!

News Desk

“राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय”, पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य

News Desk
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील चकमकीत १ दहशतवादी ठार

News Desk

श्रीनगर | गेल्या वर्षभरापासून भारताच्या सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (२८ डिसेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत एका दशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा ठार करण्यात जवानांना यश असून परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Related posts

…तेव्हा ‘या’ भूमित छत्रपती शिवाजी महाराजच उभे ठाकतात!

News Desk

४०० मुलांचा जीव वाचविण्यासाठी पोलीस बॉम्ब घेऊन धावला!

News Desk

दहशतवादाचा मार्ग पत्‍करलेल्या मुलांना त्यांच्या आईने घरी परत बोलवावे !

News Desk