HW News Marathi
राजकारण

प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यास काँग्रेसचा पाठिंबा ?

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील करत आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघात आंबेडकरांना पाठिंबा दिल्याची माहिती मिळाली आहे. आंबेडकरांना पाठिंबा देऊन राज्यभरात दलित मते मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु अद्याप यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमसोबत युती केलेल्या भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने अकोल्यात पाठिंबा दिल्याची माहिती मिळाली आहे.

आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमसोबत हातमिळवणी केली आहे. यानंतरही काँग्रेसकडून आंबेडकरांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, त्यांनी एमआयएमलादेखील महाआघाडीत घेण्याची अट घातली होती. ही अट काँग्रेसने अमान्य केली आहे. भाजपला सत्तेपासून रोखायचे असल्यास धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे लागेल, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांना वाटते. त्यामुळेच काँग्रेसकडून आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश व्हावा, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी प्रयत्नशील आहेत. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांबद्दल आंबेडकरांनी गेल्याच आठवड्यात शंका उपस्थित केली होती. आंबेडकर म्हटले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेला महाआघाडीचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे टीका केली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे लोकसभेचे जागावाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे आम्हाला आघाडीत घेण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्न हा निव्वळ दिखावा असल्याचे आंबेडकर म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप-शिवसेना युती कायम राहणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

News Desk

दिल्लीत ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेल्याचा केजरीवालांचा दावा

News Desk

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar
राजकारण

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

कर्नाटक | कर्नाटक विधानसभा निवडणुक झाल्यानंतर रंगलेले राजकीय नाट्य त्यानंतर कॉंग्रेस जेडिएसचे संयुक्त सरकार सत्तेत आल्यानंतर कुमारस्वामींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली परंतु विधानसभेत शुक्रवारी कुमारस्वामी सरकारने ख-या अर्थाने बहुमत सिद्ध केले. येडियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर कुमारस्वामी यांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध केले आहे.

येडियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेस – जेडीएस आणि बसपाच्या एकूण ११७ आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. भाजपाचे सरकार अवघ्या ५५ तासाच कोळसल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. बुधवारी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. कर्नाटक विधानसभेत १०४ आमदारांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. पण बहुमतांसाठी आवश्यक ११२ आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यामुळे येडियुरप्पा यांना अवघ्या अडीच दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसचे ७८ आणि जेडीएसचे ३८ आमदार आहेत.

दरम्यान बहुमत सिद्ध करण्यापुर्वी काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाने विधानसभा अध्यक्षासाठी एस. सुरेश कुमार यांचं नाव पुढे करत जेडीएस-काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने ऐनवेळी माघार घेतली ज्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Related posts

नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ; वैद्यकीय तपासणीला परवानगी

Aprna

आज भाजपचे उपोषण

News Desk

छत्रपतींचा असा अपमान सहन केला जाणार नाही पवारांनी सरकारला खडसावले

News Desk