HW News Marathi
राजकारण

राफेल लढाऊ विमानची किंमत सांगा

नवी दिल्ली राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रिये संदर्भातील माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला देणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यानुसार, राफेल करारातील विमान खरेदी प्रक्रियेची माहिती सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. राफेल विमान खरेदीची सर्व माहिती बंद लिफाफ्यामधून १० दिवसांत सर्वोच्च न्यायालयात देण्याचे आदेश केंद्र सरकारला दिल्या आहेत. कारण न्यायालयाकडे राफेल विमानांच्या किंमतीच्या खरेदी प्रक्रियेसंदर्भात कोणतीही माहिती नाही, असे काल(बुधवार) सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले होते.

जर राफेल विमानांच्या किंमती विशेष असतील आणि त्या सार्वजनिक करायच्या नसल्यास आम्हाला बंद लिफाफ्यातून त्याची माहिती द्या, असेही खंडपीठाने सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्याकडे स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयात राफेल करारासंबंधी एकूण चार याचिका दाखल केल्या आहेत. परंतु केंद्र सरकार अधिकृत गोपनीयता अधिनियम १९२३ कायद्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयात ३६ राफेल विमान खरेदी प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून देणार नाही, असंही सरकारी सूत्रांकडून सांगितले जाते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी पवारांकडे शिवसेना-भाजपला सल्ला देण्याची मागणी केली !

News Desk

ठाकरे सरकारच्या नामांतराला शिंदे सरकारनी दिली स्थगिती

Aprna

पुलवामा हल्ल्याबाबत यादव यांचे वक्तव्य हे गलिच्छ राजकारणाचे उदाहरण !

News Desk
देश / विदेश

बडगाममध्ये दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश

swarit

श्रीनगर | सीमारेषेवर पाकिस्तानच्या खुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारपासून (१ नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान भारतीय जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. बडगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी बडगाम परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरु केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Related posts

भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून EDच्या केसेसमध्ये चार पटीने वाढ

Darrell Miranda

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

उर्जित पटेल गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार ?

Gauri Tilekar