HW News Marathi
मुंबई

उद्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक! ‘परे’वर रात्रकालीन जम्बो ब्लॉक

मुंबई | मुंबई- सिग्नल आणि रेल्वे ट्रॅकच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार, ३० सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे वरील वसई रोड ते भाईंदर या स्थानकांदरम्यान रात्रकालिन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वा. पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाली १०.३४ ते दुपारी ३.३९ वा.पर्यंत सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणार्‍या सर्व लोकल तसेच सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वा. पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणार्‍या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

तर पश्चिम रेल्वेतर्फे शनिवार २९ सप्टेंबर आणि रविवार ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री वसई रोड-भाईंदर स्थानकांच्या मध्य अप आणि डाऊन जलद मार्गावर १२.३० ते सकाळी ४.०० वाजेपर्यंत साडे तीन तासांचा रात्रकालिन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक काळात अप तसेच डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द राहणार आहेत. तसेच दिवसकालीन ब्लॉक राहणार नसल्याचे ‘परे’ जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वाशी जवळ उलटलेली क्रेन हटवण्याचेकाम अद्याप सुरुच

News Desk

साखर कारखाना घोटाळाप्रकरणी चौकशीची अण्णांची मागणी कोर्टाने फेटाळली

News Desk

विमानातून पडली एअर हॉस्टेस

swarit
महाराष्ट्र

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटातून ३० मृतदेह बाहेर काढले, शोधकार्य थांबले

swarit

पोलादपूर | महाबळेश्वरला शनिवारी सकाळी सहलीसाठी जात असताना दापोली कृषी विद्यापीठाच्या ३१ कर्मचा-यांची बस आंबेनळी घाटातील आठशे फूट खोल दरीत कोसळून ३० जणांचा जागीच मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह घाटातून बाहेर काढण्यात ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या जवांना यश आले असून बचाव पथकाने शोधकार्य थांबवले आहे. या बसमध्ये एकूण ३१ जणांपैकी ३० जणांचा मृत्यू झाल तर, एक जण सुदैवाने बचावला. हे सर्व जण दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्माचारी होते.

कोकण कृषी विद्यापीठातील चार अधीक्षक सहलीला गेले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. त्याशिवाय चार सहाय्यक अधीक्षक, नऊ वरिष्ठ लिपीक, ११ कनिष्ठ लिपीक, एक लॅबबॉय आणि दोन चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बचावलेले प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठचे अधीक्षक असून खोल दरीतूनवर आले. त्यानंतर मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करून त्यांनी अपघाताची माहिती दिली.

अपघातातील मृतांची नावे

पंकज कंदम, प्रमोद शिगवण, सचिन गिम्हवणेकर, जयंत चौगुले, सुयश बाळ, संदिप झगडे, संदिप सुवरे, रत्नाकर पागडे, राजाराम गावडे, राजेंद्र रिसबूड, राजेश सावंत, राजु बंडवे, हेमंत सुर्वे, रोशन तबीब, निलेश तांबे, सुनिल साटले, सुनिल कदम, रितेश जाधव, किशोर चौगुले, संतोष जालगावकर, विक्रांत शिंदे, दत्ताराम धायगुडे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, संदिप भोसले, प्रशांत भाविड,संजीव झगडे, सचिन गुजर, संतोष झगडे, सचिन झगडे या आपघातात मृत झालेल्या ३० जणांची नावे आहेत.

Related posts

मित्रपक्षांचं काही माहित नाही पण आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार – नाना पटोले

News Desk

महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य ‘सहकाराचा’ आणखी एक अंक-  अतुल भातखळकर

News Desk

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!, भाजपचा टोला

News Desk