HW News Marathi
क्राइम

वसई, विरारमध्ये सीरिअल रेपिस्टची दहशत

मुंबई | वसई आणि विरारमध्ये सध्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलींवर विनयभंग आणि बलात्कार करणारा “सीरिअल रेपिस्ट” आता वसई आणि विरारमध्ये दाखल झाला आहे. या रेपिस्टने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे अल्पवयीन मुलींना नराधमाने आपले शिकार बनवले आहे.

हा सीरिअल रेपिस्ट वसई, विरार आणि नालासोपारा या भागात दाखल झाला आहे. गेल्या चार दिवसात या नराधमाने नालासोपाऱ्यातील दोन मुलींना आपले शिकार बनवले आहे. तुलिंज पोलीस ठाण्यात नराधमा विरोधात बलात्कार आणि विनयभंग असे दोन्ही गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरल्याले दिसत आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. हा नराधम अल्पवयीन मुलींच्या मागे जातो, “तुझ्या वडिलांनी मला तुला घ्यायला पाठवले आहे”. “तुझ्या वडिलांचे पार्सल आले आहे, अशा सांगून निर्जन ठिकाणी घेऊन त्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करतो”.

या सिरिअल रेपिस्टला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये या नराधमा दिला होता. पिडित मुलींनी त्याला ओळखले आहे. त्याआधाराव पोलिसांनी त्याचे छायाचित्रे शहरातील विविध ठिकाणी लावण्याली आहे. तसेच पोलिसांनी पालकांना आणि मुलांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

५४ वर्षे भारतात राहिलेल्या चीनी गुप्तहेराचा मृत्यू

News Desk

…म्हणून त्याने आपल्याच वडिलांना जीवंत जाळले

News Desk

नगर दारूकांडातील बळींची संख्या सात वर

News Desk
राजकारण

राष्ट्रवादीच्या बैठकीत १० जागांवरील उमेदवार होणार निश्चित

Gauri Tilekar

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत १० जागांवरील लोकसभेचे काही उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सातारा, माढा, कोल्हापूर या जागांबाबत काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यनंतर दोन्ही काँग्रेसची एकत्रित बैठक होणार आहे. त्या बैठीकमध्ये जागावाटपाबबत चर्चा होणार आहे. कोणी किती जागा लढवायच्या, मित्र पक्षांना कोणाच्या कोट्यातून कोणत्या आणि किती जागा सोडायच्या याबातही चर्चा होणार आहे. गेल्यावेळी लढवलेल्या काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा सांगितला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. तर पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही बैठकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Related posts

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे धक्कादायक !

News Desk

चहाचा रिकामा कप देणाऱ्याच्या हातात देशाची सत्ता, मागासवर्गीय असणे अभिशाप

News Desk

अमित शहांचे शिवसेनेला अल्टिमेटम

News Desk