HW News Marathi
क्रीडा

Asian Games 2018 | आशियाई स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्य पदक

जकार्ता | भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळाले आहे. भारताने नेमबाज अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारने स्पर्धेत पहिल्याच दिवशी पदक मिळविले आहे. या जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदाकाची कमाई केली आहे.

अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीने ४२९.९ गुणांची नोंद करत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कांस्य पदक पटकविले. चीन तैपेईच्या लीन यींगशीन आणि लू शा ओचुआन जोडीने ४९४.१ गुण मिळवून सुवर्ण मिळविले.

भारतीय महिला कबड्डी टीमने रविवारी जकार्तात १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली. भारतीय टीमने ग्रुप-एमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात जपानला ४३ -१२ ने पराभूत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk

आशियाई क्रीडा स्पर्धेचे आज शानदार उद्घाटन

News Desk

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप

swarit
देश / विदेश

केरळमधील महापुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू

swarit

तिरुअनंतपुरम | सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील पुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. पावसाचा जोर आज (रविवार) कमी झाला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे पावसाचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. परंतु अनेक जिल्ह्यात परिस्थिती जैसे थेच आहे. केरळ प्रशासनाने १४ जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता, मागे घेतला आहे.

पुरातमध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे काम एडीआरएफ टीमच्या वतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफने आतापर्यंत १० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पूरग्रस्थांच्या मदतीसाठी वायुसेनाही दिवसरात्र काम करत आहे. तसेच पूरग्रस्थांना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवण्याचे काम ही वायुसेनेकडून केले जात आहे. आतापर्यंत केरळमध्ये एनडीआरएफच्या ५० टीम बचावकार्यस मदत करत आहेत.

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळमधील पूरपरिस्थतीची हवाई पाहणी देखील केली.

Related posts

मध्यप्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब

News Desk

PMLA कायद्यातील ईडीचे अधिकार अबाधित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna

बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना सामनातून उजाळा

News Desk