HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावात २९ वीजचोरांवर कारवाई

 

जळगाव – ‘महावितरण’तर्फे वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत कुसुंबा (ता. जळगाव) गावात सोमवारी तपासणी करण्यात आली. त्या वेळी आकडे टाकून वीजचोरी करताना २९ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच पाहणीनंतर लघुवीजदाबाचे वीस खांब उभारणीचे नियोजनहीकरण्यात आले.

‘महावितरण’कडून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम सुरू आहे. मोहिमेंतर्गत आकडे टाकून वीजचोरी करणारे, मीटरमधील फेरफारची तपासणी करण्यासोबत मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीने घेतलेल्या रीडिंगमधील पाच टक्‍के मीटरची तपासणीदेखील केली जात आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कुसुंबा येथे सोमवारी जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे यांच्या आदेशावरून तपासणी करण्यात आली. यात श्रद्धा कन्स्ट्रक्‍शन व व्ही. डी. कन्स्ट्रक्‍शन तसेच नारायण पाटील, कविता पाटील,विमलबाई राठोड यांच्यासह २९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सण-वार काही काळ बाजूला ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं गोविंदा पथकांना आवाहन!

News Desk

अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

News Desk

वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही !

News Desk
महाराष्ट्र

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk

अकोला – मंगळवारी महसूल दिनानिमित्त स्वत: येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्यांच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा उताऱ्यांचे वितरण केले.

सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. या वेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचे शेतकऱ्यांना वितरण केले. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Related posts

गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक!

News Desk

नांदेड-मुंबई विमानसेवा 1 मे पासून सुरू

News Desk

“हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा” – उदयनराजे भोसले

News Desk