HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांविरोधातील कारवाईवरून राहुल गांधींची सरकारवर टीका

मुंबई | महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पवार आज (२७ सप्टेंबर) ईडीच्या कार्यालयात दुपारी २ वाजता जाणार आहेत. “शरद पवारांच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी ट्वीट करून भाजप सरकारवर म्हटले की, पवारांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना अशाप्रकारे विरोधकांवर कारवाई करण्याचे सरकारचे हे सुडाबुद्धीने केले राजकारण असल्याचा आरोप राहुल गांधी केला आहे.”

घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घोटाळ्या प्रकरणात शरद पवार यांचे नाव नसता नाही त्यांची नोटीस काढली असल्याचे सांगत कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज ईडी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. ईडी कार्यालया बाहेरील परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी १४४ कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मात्र, कोणतीही नोटीस बजावण्यात आली नसतानाही पवार स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. पवार ईडी कार्यालयात शरद पवार बाहेर पडले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, म्हणून त्यांनी घराबाहेर पडू नये, पोलीस विनंती करणार आहेत. यासाठी सहपोलीस आयुक्त विनय चौबे यांनी घेतली शरद पवारांची भेट घेतली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रविण दरेकर, गिरीश महाजन माणगावमध्ये अडकले, बचाव दलासोबत पुढे जाण्याचा प्रयत्नात

News Desk

…तर विधानसभेत आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो !

News Desk

बाबासाहेबांना जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो – राज ठाकरे

News Desk