HW News Marathi
महाराष्ट्र

यशोमती ठाकूरांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, खिसे गरम करण्यासाठी…चित्रा वाघ यांची टिका !

अमरावती | राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर पोलिसाला मारहाण केलेल्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात न्यायालयाने यशोमती ठाकूर आणि त्यांच्यासह दोन कार्यकर्त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणावरुन भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. “गाडी का अडवली? म्हणून पोलिसांनी मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता. पण खिसे गरम करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल”, अशा खरमरीत शब्दांत वाघ यांनी ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

८ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी अमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणे, याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अमरावती जिल्हा न्यायालयाने यशोमती ठाकूर यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर यांचा कारचालक आणि त्यांच्यासोबत असलेले दोन कार्यकर्तेही दोषी आढळले आहेत. त्याबरोबरच फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलीसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुकानातील चोरी सीसीटिव्हीत कैद

News Desk

“मोदी गुजरात दौऱ्यावर, फडणवीस कोकण दौऱ्यावर; मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

News Desk

“शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रीपद?”, फडणवीस म्हणाले…

News Desk