HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे पुरेसे लक्ष नाही | शरद पवार

जळगाव | सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. देशातील ८० टक्के लोक शेती करतात, त्यापैकी ६० टक्के शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याचे माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी जामनेर तालुक्यातील नेरी येथील दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते अमृतराव चिंधूजी पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण करताना बोलत होते.

१९८० मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी अमृतराव चिंधूजी पाटील यांनी जळगावाहून नागपूरपर्यंत पायी दिंडी काढली होती. तसेच या जिल्ह्यात पुर्वी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होते. पाटील यांनी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. परंतु सध्या जिल्ह्यात पैशाचे राजकारण चालत असल्याचे पवारांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांना भेटलं तर त्यावर विश्लेषण करण्यासाठी आपला वेळ वाया का घालवा?

News Desk

एवढीच जर हिंमत असेल तर २ तास तुमची वर्दी बाजूला ठेवून आमच्याशी भिडा!

News Desk

दिवसेंदिवस भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ!

News Desk