HW News Marathi
महाराष्ट्र

वाझे प्रकरणात सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची भुमिका घेतली त्याची ही प्रतिक्रिया – जयंत पाटील

मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी काल (२० मार्च) केला. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सिंग यांनी हा दावा केल्यानंतर या लेटर बॉम्बमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकरने कठोर भूमिका घेतल्यामुळे त्यांची ही प्रतिक्रिया आली असेल अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील दिली आहे. त्यांनी मुंबईचे माजी पोलीस महासंचालक परमबीर सिंग याचं नाव न घेता, ही प्रितक्रिया दिलीये. तसंच त्यांनी कोठेही लक्ष भटकू न देता मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनने भरलेली गाडी कशी आली, हे सत्य जनतेसमोर आणणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ट्विट करुन त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर पैशांच्या वसुलीचे गंभीर आरोप झाल्यांतर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी विरोधकांकडून होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनीसुद्धा देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोपांचे गांभीर्य ओळखता देशमुख यांची मंत्रिपदावरुन गच्छंती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गृहमंत्रिपदाचा कारभार विद्यामान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी वरील संतुलीत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
“राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री कार्यालयाने तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर भूमिका घेतली. या प्रकरणात जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने त्यांची प्रतिक्रिया आली असेल. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी कोणी ठेवली? त्यात जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या?, मनसुख हिरेन प्रकरणात काय घडलं? हे राज्याच्या जनतेसमोर आणणे सध्या महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी,” असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार!- मंगलप्रभात लोढा

Aprna

१ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण, महापालिकेचा मोठा निर्णय!

News Desk

राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान

Aprna