HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून भाजपने कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे – जयंत पाटील

मुंबई | टाळी, थाळी वाजवून, दिवे लावून देशातील कोरोना जाण्याऐवजी उलट वाढला. देशाच्या पंतप्रधानांचा निर्णय म्हणून आपण जे जे केले, त्याने कोरोनावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आणि राज्य सरकारचा निषेध करणार्‍या भाजपने कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

“राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे सरकार संयमाने निर्णय घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळवित आहे. मात्र सर्वसामान्यांची काळजी नसणारे विरोधक मंदिरे उघडा, शाळा उघडून गर्दी वाढवून कोरोना वाढवण्यावर भर देत आहेत. मात्र राज्य सरकार याकडे फारसे लक्ष न देता उपाययोजना करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहे,” असं पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रेकिंग: छगन भुजबळ यांच्या लढ्याला मोठे यश

Sanjay Jog

बाबरी मशिदचा निर्णय देशहिताचा नाही – प्रकाश आंबेडकर

News Desk

अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

News Desk