HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेत्यांनो, जनाची नाही पण मनाची तरी ठेवा! धनंजय मुंडेंचा घणाघात

बीड । अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज (२३ ऑक्टोबर) बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कृतज्ञता मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “भाजपच्या नेत्यांनी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगावी”, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडेंनी यावेळी केली
धनंजय मुंडे म्हणाले की, “ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मधल्या काळात नको तेवढे आरोप झाले. महाविकास आघाडी सरकारमधील ओबीचीचे नेते करतायत तरी काय? राजीनामे द्यावेत इथपर्यंत मागण्या करण्यात आल्या. ज्यांनी खऱ्या अर्थाने आरक्षण अडचणीत आणलं तेच आज आम्हाला हे प्रश्न विचारतायत. मात्र, याबाबत खरा आवाज उठवला छगन भुजबळ यांनीच आणि तुम्ही आमच्यावरच आरोप करताय?”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी नाव न घेता भाजपवर निशाण साधला.

“दोष नेमका कोणाचा?”

पुढे धनंजय मुंडे म्हणाले की, “आमच्या ओबीसी नेत्यांना तुम्ही समाजावर अन्याय करताय असं म्हणणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे होती”, अशी टीका धनंजय मुंडेंनी भाजपच्या नेत्यावर नाव न घेता केली आहे. “या आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेला, सगळ्या तारखा झाल्या, सूनवण्या झाल्या, साक्षी-पुरावे देण्यात आले ते कोणाच्या काळात? आमचं सरकार आल्यावर फक्त निकाल लागलाय. मग ह्या सगळ्यात दोष नेमका कोणाचा?”, असाही सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळी काॅंग्रेस शहराध्यक्षांसह जवळपास २५ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Aprna

सेनेने बाळासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी महायुतीत यावे – रामदास आठवले

News Desk

कब्रस्थानाच्या दो गज जमीनीसाठी दोघाची दिल्ली पदयात्रा !

News Desk