HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाच्या विधानसभेत पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे आमने-सामने

बीड । आगामी विधानसभा निवडणुकीकरिता परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या भावा-बहिणीत कडवी झुंज पाहायला मिळेल हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिरूर येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी यानंतर परळी मतदारसंघात एक सभा देखील घेतली. “मी तुम्हाला शब्द देतो की जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत परळीचा विकास करत राहणार. तुमची ताकद माझ्यासोबत आहे. त्यामुळे या राज्यात शिवस्वराज्य येणारच”, असा दावा करत धनंजय मुंडे यांनी येथील जनतेला भावनिक साद घातली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा देखील साधला आहे. “परळी, अंबाजोगाई वगळता बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात पिकविमा मिळाला. मग आम्ही काय गुन्हा केला आहे ?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

“इथले लोकप्रतिनीधी जाणूनबुजून असा भेदभाव करत आहेत. दुष्काळाचे सावट असताना या तालुक्यांना असं वाऱ्यावर सोडणं यांना शोभतं का ? आमच्यावर हा अन्याय केला ? आम्ही जाब विचारणारच”, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. “गोपीनाथराव मुंडे साहेबांनी वैद्यनाथ कारखान्याला काळजाप्रमाणे जपलं, मात्र आज त्यांच्याच वारसदारांनी या कारखान्याची दशा केली आहे. विश्वासाने मतांचे आंदण दिलेल्या शेतकऱ्यांनाच यांनी लुटले”, अशी टीका देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वयाची अट असताना फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली?”,काँग्रेसचा सवाल

News Desk

“सभागृहात कसं वागायचं हे शिकवा यांना…” फडणवीस भडकले

News Desk

कुणी चंपा म्हणतो, कुणी टरबूज्या म्हणतो हे खपवून घेतले जाणार नाही – चंद्रकांत पाटील

News Desk