HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा मोर्चाचे दुसरे पर्व

उस्मानाबाद | मराठा आरक्षणाचे दुसरे पर्व सुरु करण्यात येणार असल्याचे आयोजकाने सांगितले आहे. त्यासाठी आज तुळजापुरात रॅली काढण्यात आली. आतापर्यंत मराठा मोर्चाने शांततेच्या मार्गाने ५८ विक्रमी मोर्चे काढले असून देखील अद्याप आरक्षण मिळाले नाही.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोगाने गती वाढवावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. यानंतर ३१ जुलैपर्यंत माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचे काय झाले, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आठवडाभरापुर्वी राज्य सरकारला केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे.

विनोद पाटील यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. की, मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वीच घेण्यात यावा. जेणे करून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंशी मतभेद नव्हतेचं ! शरद पवारांचा दावा

News Desk

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Aprna

साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू!

News Desk