HW News Marathi
महाराष्ट्र

इच्छुकांना पक्षात परत घेण्यात कोणतीही अडचण नाही, अनेकजण संपर्कात !

मुंबई | “राष्ट्रवादी पक्ष एकसंघ आहे. पक्षात कोणताही वाद नाही. भाजपमध्ये गेलेल्या राज्यातील अनेक नेत्यांना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षात घरवापसी करायची आहे. त्यांना पक्षात घेण्यात कोणतीही अडचण नाही”, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. “निवडणुकांपूर्वी अनेक जण भाजपमध्ये गेले. मात्र, ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला ते सध्या आमच्याशी संपर्क करत आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा सुरु आहे. त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात कोणतीही अडचण नाही”, असे जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या ‘मिशन घरवापसी’ला सुरुवात झाल्याच्या चर्चा रंगत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणतात, “पार्थ पवार नाराज आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले ? मुळात ते नाराज का असतील ? पार्थच्या आजोबांना त्यांना काही बोलण्याचे, सुचविण्याचे सर्वाधिकार आहेत. कुटुंबातले वडीलधारे जर काही बोलले तर आपण नाराज होतो का? पार्थना त्यावेळी जी भूमिका योग्य वाटली ती त्यांनी घेतली. त्यामागे काही विशेष हेतू आहे असं मला वाटत नाही”, असे जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. त्याचप्रमाणे, “अजित पवारही नाराज नसून पवार कुटुंबात कोणताही वाद नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात बैठका सुरुच, महाविकासआघाडीची आज महत्वाची बैठक होणार!

News Desk

परमबीर सिंग यांची ठाकरे सरकारविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात धाव

News Desk

आता धनगर समाजाला देखील लागू होणार अनुसूचित जमातीच्या २२ योजना

News Desk