HW News Marathi
Covid-19

गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांची केली पाठराखण, तर खडसेंच्या सहकार्याची आम्हाला गरज !

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीत डावल्याने नाराज भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वावर सडकून टीका केली होती. यावेळी खडसेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील आरोप केला होता. मात्र, खडसेंनी पाटलांवर केलेला आरोप त्यांच्या जिव्हारी लागला होती. खडसे आणि पाटील यांच्या वाद शांत करण्यासाठी पक्षाचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन धावून आले.

दरम्यान, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली आहे. महाजन म्हणाले, खडसेंचा संताप क्षणिक असून कधी कुठेही संताप व्यक्त करतात. खडसेंचे पक्षात मोठे योगदान आहे. तर खडसेंच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, असे ते म्हणाले. तर खडसे कुठलाही निर्णय घेतील असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता पाटील आणि खडसे यांच्या वादात महाजनांनी उडी घेतली आहे. यानंतर आता खडसेंचा नाराजी दूर करण्यायस संकटमोचक यांना पक्षातील वाद शांत करण्यात यश येईल. की, खडसे आणि महाजान यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप करत हे कळेच. मात्र, भाजपमधील अंतर्गत वाद लवकर शांत होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे.

कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का?

नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळाले आहे. त्यांनी आजवर अनेकांना डावलून घरात तिकिटे दिली, त्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा सवाल उपस्थिती करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती पलटवार केला.

भाजपमध्ये त्यांचे योगदान शून्य | खडसे

“राज्यात भाजपला तळागाळात पोहचवण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य खर्ची केले. पक्षाने खूप काही दिले हे मी मान्य करतोच. पण राज्यात पक्षाला आम्ही उभे केले आहे. संघटना म्हणून काय काम करायचे असते ते चंद्रकांत पाटलांना काही माहिती नाही. ते प्रदेशाध्यक्ष म्हणून ते फक्त पक्षाची भूमिका मांडण्याचे काम करत आहेत. भाजपमध्ये त्यांचे योगदान शून्य आहे,” अशा शब्दात खडसेंनी पाटलांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.

संबंधित बातम्या

प्रदेशाध्यक्ष म्हणून फक्त पक्षाची भूमिका मांडतात, भाजपमध्ये त्यांचे योगदान शून्य !

माझा पत्ता राज्यातील नेत्यांनीच कट केला, खडसेंचा महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर टीका

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या अजून किती लाटा येणार, सांगू शकत नाही’! –  तात्याराव लहाने

News Desk

औरंगाबदमध्ये आजपासुन सुरू होणारा लॉकडाऊन रद्द

News Desk

देशात 38 हजार 792 नवे रुग्ण आढळले

News Desk