HW News Marathi
महाराष्ट्र

भिडे गुरूजी आहेत कुठे ?

महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूरमध्ये गेल्या ४ दिवसांपासुन पुरजन्य परिस्थिती आहे. आता जगभरातून पूरग्रस्तांना मदत मिळते आहे , मात्र परमपूज्य भीडे गुरुजी कुठे आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी ट्विट करत भिडे गुरुजींवर निशाणा साधला आहे.

सांगली कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफ , लष्काराला पाचारण करण्यात आले आहे . आज पावसाने उसंत घेतल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होत आहे. आता राज्यातील सर्व राजकीयपक्ष सामाजिक संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप मदतीसाठी एकत्र येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व खासदार, आमदार लोकप्रतिनिधीचे एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे, तर शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये अवघ्या अर्धा तासात जवळपास 1 कोटी रुपयांचा निधी उभा करत पूरग्रस्तांनाच्या मदतीला हातभार लावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाझे थेट परमबीर सिंगांना द्यायचे माहिती, मुंबईतील पाच बार मालकांना ईडीचे समन्स

News Desk

आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न केला!

News Desk

मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार; प्रतिलिटर 80 रुपये मोजावे लागणार

Aprna