HW News Marathi
मुंबई

ब्रेकिंग | माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या

मुंबई | राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. कॅन्सर या आपल्या दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर अर्थात कर्करोगाने ग्रासले. त्यातून ते बरे होत होते मात्र नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे.

डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून हिमांशू रॉय ओळखले जात होते. गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरने ग्रासले होते. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हिमांशू रॉय हे १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. १९९५ मध्ये नाशिकमधील ग्रामीण पोलीस अधीक्षक, अहमदनगर पोलीस अधीक्षक, नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागातील उपायुक्त, २००९ साली मुंबईत पोलीस सहआयुक्त, सायबर सेल, दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अशी अनेक पदे त्यांनी सांभाळले आहेत. तसेच महाराष्ट्र अतिरिक्त पोलीस महासंचालक पद सांभाळत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जोरदार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

News Desk

मध्य रेल्वेने अखेर रविवारचे वेळापत्रक केले रद्द

News Desk

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाने मुंबईकरांना दिली ही आनंदाची बातमी

swarit
देश / विदेश

आठवीच्या पुस्तकात बाळ गंगाधर टिळक दहशवादाचे जनक

News Desk

नवी दिल्ली : राज्यस्थानमधील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स पुस्तकात बाळ गंगाधर टिळक हे दहशवादाचे जनक असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे. या पुस्तकामध्ये टिळकांबदल जे छापले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोड फुटले असून महाराष्ट्रात या प्रकरणाचे किती तीव्र पडसाद पडतील हे येता काळाच सांगू शकेल. या प्रकरणा बदल राजस्थान सरकार काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

धड्यात टिळकांबदल नेमके काय म्हटले

‘अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यामध्ये टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला आहे.’ टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. राज्यस्थानमधील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरेन्स पुस्तकात असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात, असे या धड्यात म्हटले आहे. शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे देखील या धड्यात म्हटले गेले आहे.

Related posts

नासाने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणून यशस्वी !

News Desk

गुगलचा जाहीर माफीनामा

News Desk

नव्या कोरोना स्ट्रेनला भारतात रोखण्यात आले यश

News Desk