HW News Marathi
मुंबई

केडीएमसीने रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले

मुंबई | पाऊसाला सुरुवात झाली की, मुंबईत पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. या खड्ड्यांमुळे मुंबईत अनेकांचे जीव गेले असून या खड्ड्यांमुळे १५ मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागतो. रस्त्यात खड्डे पडण्यामागचे कारण केडीएमसीने शोधन काढले आहे. की, ‘सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे केडीएमसीने चौकात फलकाद्वारे नागरीक आणि वाहन चालकांना’ सांगितले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने महत्त्वाच्या चौकात ५० फलक लटकवले आहेत. या फलकाच्या माध्यमातून नागरिकांना खड्ड्यांपासून स्वत:चा जीव वाचविण्याचे आवाहनही केले आहे. रस्त्यावरील खड्डेमुळे अपघाती मृत्यूचे कारण होऊ शकत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या वक्त्वयाने सर्व सस्तरातून निषेध व्यक्त केला गेला.

पाटील यांच्या वादग्रस्त विधानाला ४८ तास देखील पूर्ण झाले नाही तर, केडीएमसीच्या रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले आहे. या खड्ड्यांसाठी पालिकेने प्रशासन आणि कंत्राटदाराल जबाबदार न धरता पावसाला दोष दिला जात असल्याचा अजबप्रकार कल्याण-डोंबिवलीत उघडकीस आला आहे.

तसेच केडीएमसेच्या रस्त्यांची चाळ झाली असून पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण अधिक वाढले असून रस्ते अतिशय खराब झाले आहे. यामुळे वाहनचालक आणि दुचाकीस्वारांनी हळू व काळजीपुर्वक चालवावीत, असे फलक केडीएमसीने प्रमुख चौकात लावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अंधेरीमध्ये व्यावसायिक इमारतीला आग

swarit

मुंबईत पावसाचा धिंगाणा, रेल्वे, विमान सेवा ठप्प

News Desk

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारणारी भाषा ही मराठीच होती

swarit
मुंबई

मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ओव्हरफ्लो

News Desk

मुंबई | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणारे चारही धरणे भरली आहेत. गेल्या १५ दिवसापासून सुरू असलेल्या मुंबईसह धरणे परिसरात दमदार पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांची तहान भागविणारे धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. तुळशी, मोडकसागर आणि विहार ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. आणि यानंतर आज पहाटे तानसा धरणेही १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी ९ व १० क्रमांकाचे दोन दरवाजे उघडण्यात आल आहेत.

सोमवारी मोडक सागर धरण १०० टक्के भरल्यानंतर त्याचेही २ दरवाजे उघडण्यात आले होते. मुंबईतील पावसामुळे गेलाय दोन दिवसांत धरणातील जलसाठा तब्बल सव्वादोन लाख दशलक्ष लीटरने वाढला आहे. तुळशी, मोडकसागरबरोबरच सोमवारी सकाळी विहार तलावही भरून वाहिले. तसेच तलावातून मुंबईला दररोज ११० दशलक्ष लीटर जलसाठा पुरविण्या येतो. यंदा मुंबईकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे

Related posts

परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुरडेच्या खूनाचा छडा

News Desk

‘जय राजस्थान’ चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्मरणशक्तीचे पुस्तके पाठवणार

News Desk

मालाडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग; 50 झोपड्या जळून खाक

Aprna