HW News Marathi
मुंबई

आता खाजगी विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान 

मुंबई | मुंबईतील खाजगी विनाअनुदानित शाळांना पालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून प्रत्येकी ५० टक्‍के अनुदान दिले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान पालिकेला मिळालेले नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे बंधनकारक कर्तव्य समजून या शाळांना १०० टक्के अनुदान देण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या सभागृहाची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता या शाळांना लवकरच १०० टक्के अनुदान मिळणार आहे.

शासनाकडून या शाळांना मिळणारे ५० टक्के अनुदान गेल्या २००४ पासून बंद झाले आहे. मात्र महानगरपालिका या शाळांना नियमित अनुदान देत आहे. सरकारने अनुदान देणे बंद केल्याने खासगी विनाअनुदानित शाळातील व्यवस्थापनाला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेतन देणे अवघड झाले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी केवळ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून काम करीत आहेत. मात्र या शाळांना मोठ्या आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या शाळांच्या समस्यांचा विचार करून शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी या शाळांना पालिकेने १०० टक्के अनुदान देण्याची मागणी केली होती. त्याबाबतच्या मागणीच्या प्रस्तावाला पालिका सभागृहाची मंजूरी मिळाली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या शाळांची दखल घेऊन शाळांना १०० टक्के अनुदान देण्यास संमती दर्शविली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नको त्या आवस्थेत पाहिल्यामुळे भावाने केला बहिणीचा खून

News Desk

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात सीबीएसईचा पेपर नाही!

News Desk

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील तपासावर हायकोर्ट नाराज

swarit
राजकारण

मोदींनी साईबाबा मंदिरातील पुस्तकात काय लिहिले ?

swarit

शिर्डी | पंतप्रधान नरेंद्र मोदी साई समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्ताने शिर्डीत साई चरणी लीन झाले असून मोदींनी साईच्या पादुकांचे पूजन केले. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना साईबाब मंदिरात असलेल्या पुस्तकात त्यांनी अभिप्राय लिहिला आहे. ‘श्री साईबाबांच्या दर्शनानं मनाला शांतता मिळाली. श्रीसाईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण मानवतेला प्रेरणा देणारा आहे. शिर्डीत सर्वधर्मसमभावाचं अद्भुत स्वरुप पाहायला मिळतं. सर्व पंथांचे लोक श्रीसाईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता, श्रीसाईबाबांचा सबका मालिक एक है हा संदेश जगाच्या शांततेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सर्व साईभक्तांना साईबाबांचा आशीर्वाद मिळू दे. त्यांना सुख आणि शांतता मिळू दे, अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा साईंच्या चरणी नतमस्तक होतो,’ असा अभिप्राय मोदींनी पुस्तिकेत नोंदवला.

 

 

साईची मनोभावे आरती करून साईच्या समाधीवर चादर चढवली आहे. यावेळी मोदींसोबत राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शताब्दी उत्सवा निमित्ताने मोदी ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत राज्यभरात बांधलेल्या घरकुलांपैकी २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात आली आहे. या सभेत मोदींनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत.

 

Related posts

तुम्ही कोणीही सुनावणीसाठी लायक नाही !

News Desk

दिल्लीत ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेल्याचा केजरीवालांचा दावा

News Desk

आता भाजपचा स्वबळाचा नारा

News Desk