HW News Marathi
देश / विदेश

लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावली, सहा खासदार निलंबित

नवी दिल्ली: लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकवल्याप्रकरणी काँग्रेसच्या ६ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ही कारवाई केली. काँग्रेसचे खासदार जी. गोगाई, के. सुरेश, अधिरंजन चौधरी, रणजित रंजन, सुश्मिता देव आणि एम. के. राघवन यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले. त्यांनी शून्य प्रहरात लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकावले. दरम्यान, या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

सकाळी कामकाज सुरू झाल्यापासून लोकसभेत विरोधकांचा गोंधळ सुरू होता. कामकाज सुरू होताच काँग्रेसने गोहत्येच्या नावाखाली जमावाकडून होत असलेल्या हत्यांच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी संपूर्ण देश गायीला माता मानतो. पण गोरक्षणाच्या नावाखाली कोणाची गुंडगिरी सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पण यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यातच काँग्रेसने बोफोर्स तोफांवर घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.

दुपारी कामकाज सुरू होताच काँग्रेसचे खासदार गोगाई, के.सुरेश, चौधरी, रणजित रंजन, देव आणि राघवन हे आक्रमक होत. अध्यक्षांच्या आसनाजवळ आले. त्यांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरूवात केली. लोकसभा अध्यक्ष त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होते. त्याचदरम्यान या खासदारांनी हातातील कागद लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी महाजन यांनी या खासदारांना ५ दिवसांसाठी निलंबित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुका अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी ७५% मतदानाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

News Desk

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात

News Desk

एका सच्च्या पत्रकाराचे पंतप्रधानांना पत्र

News Desk