HW News Marathi
राजकारण

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

बीड | सरकारने राज्यात दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून सर्व माहिती सरकारी फायलीतून मंत्रालयातपर्यंत पोहचविण्याच आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राज्यामध्ये सगळे मंत्री दुष्काळी दौरा करण्यास सुरुवात केली आहे.. राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शनिवारी रात्री चक्क टॉर्च प्रकाशात पिकांची पाहणी केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरू लागली असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करू अशी घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर पालमंत्र्यांनी त्यांच्या भागातील दौरे करून दुष्काळाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. माजलगावच्या नित्रुड गावात दुष्काळस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर शनिवारी रात्री आले होते. परंतु निलंगेकर यांना नियोजित वेळपेक्षा तब्बल चार तास उशिरा आल्याने अंधार पडला होता. जेव्हा ते गाडीतून उतरले तेव्हा अंधार पडला होता. त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कापसाच्या पिकांची पाहणी केली. अंधारात दिसत नसल्यामुळे टॉर्चच्या उजेडात पिकांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ही पाहणी त्यांनी २० मिनिटांत आटोपल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला


 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मर्यादेत वाढ केल्याशिवाय हे आरक्षण टिकणार नाही !

News Desk

सुंदर चेहऱ्यांमुळे मते मिळत नाहीत !

News Desk

जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल !

News Desk